भांडणं घरातली असो वा समाजातली
त्याचा परिणाम इतर लोकांवर सुद्धा होतो, त्यामुळे
दोन जणांची आपापसातील भांडण थांबवायची असेल तर
दोघातून एकाला तरी शांत व्हायला पाहिजे तर भांडण आपोआप कमी होईल
आणि समोरचा शांत होईल याची वाट बघू नका, स्वतः माघार घ्या.....-
मीचं आपला म्हणतो तिला की
माझी आठवण नाही का आली,
तिचं त्यावर उत्तर
" तुझी आठवण सारखी यायला
मी काय तुझ्या लय लांब नाही गेली.
असं काही ऐकून मग पुढे बोलायला
धिरच होत नाही,
भांडाव तरी कसं आता कारण
तिला भांडणाच कारणच कळत नाही.
मी रागात देतो उत्तरं तरी
तिचं सारं नॉर्मलच असतं,
इतक्या दिवसांच्या अबोल्यानंतरही
तिला काहीच कौतुक नसतं.
मी आपला गप्प होतो अन ती
बोलायचा विषय बदलते,
माझ्या मनाची मीचं घालतो समजूत
कारण दरवेळी हे असंच घडते.-
भांडलीस तरी चालेल,
खोटं खोटं वागणं नको.
डोळ्यांनी खरं, ओठांनी,
खोटं खोटं सांगणं नको.-
डोळ्यांनी मोजले, देवा तिला मी पाहिले
आयुष्याशी सोबत तिची माझी,
जन्म कीतवा सात जन्मातला सोबती,
सांग देवा सत्यात कधी भेटुनी तरी...
#तेजस-
तू राग कर ,तू भांडण कर, मनात येईल ते बोलून जा ,,
नको राहू आयुष्य भर पण एकदा मिठीत घे न सोडून जा...💔🙌-
क्षणभराचंच भांडण ना ते
मग का घाव जन्मभराच्या नात्यावर,
अहो कुणी दात पाडून टाकतं का
जीभ त्याखाली आल्यावर..
-
काही लोकांसोबत, व्यवस्थित भांडण पण करता येत नाही, आणि काहींना कुणासोबतच भांडता येत नाही.
तर काही भांडूणसुध्दा क्षणातच सामान्य वागू लागतात.
तर काही भांडणं इतकी लांबतात, की वर्षानुवर्षे अबोल होतात.
मला अश्या लोकांचं फारचं कौतुक आहे, किती संयमी आहेत ही!-
इतरांची ऊणी-धुणी
काढून भांडण उकरून
काढणाऱ्या भांड-कुदळे
व्यक्तीस धुणी-भांडी
करायची कामे द्यावी.
🤣😂
-
बायको सोबत भांडणात,
कुठलाच नवरा कधी जिंकत नसतो.
बायकांचा हा गैरसमज असतो,
कारण बायकोनं हारावं,
असं कुठल्याच नवऱ्याला वाटत नसतं.
कारण ती हार सहन करणे म्हणजे,
नवऱ्याचं बायको वरील प्रेमाचा भाग असतो.-
दोन प्रवाह एकत्र आले की भोवरा निर्माण होणारच यात काहीच शंका नाही .!!
-