स्त्री पुरुषापेक्षा जास्त त्याग करते का?
स्त्री पुरुष समांतर म्हंटल्यावर दोघांकडेही एक माणूस या दृष्टिने बघितल तर त्याग ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या जडनघडणीवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीच्या मनावर झालेले संस्कार त्याची वागणुक ठरवतात. यात बहुंताशी पुरुषांवर कठोर, जबाबदार या आशायचे विचार बिंबविल्यामुळे त्यांना त्यागाची फारशी गरज भासत नाही..या उलट स्त्री वर परावलंबी, मृदू अशे विचार उमटवले जातात म्हणुन तिचा स्वभाव समयोजीत होतो. आणि याच मुळे स्त्री लग्नांतर त्यागाला सामोरे जाते. पण अपवादीत पुरुष, ज्यांच्या मनाची वाढ योग्य रित्या झालेली असते ते त्या त्यागातही 'साथीदार' बनतात .-
मनाच्या उन्हाळ्याचे कोरडे डोहाळे,
कविता उदरी घेतलेल्या कवीच्या मनातून
सुरू होतात कदाचित..
त्याला जाणवत असत
मनाच्या जमिनीतीले शेवटचे उगवू
पाहणारे छोटेसे वाळलेले कोंब.
तेच कोंब जे, कधीकाळी
त्याच मनाच्या चौकटरुपी
अंतर्मुख, निःशब्दाच्या भिंती
चिरत उगवत असत.
पण, ह्या जाणीवा बोचतात त्याला.
कुठेतरी, त्या कोंबाची दया अस्वस्थ करते.
इतक्या उन्हाच्या झळांनी आलेल्या त्याच्या घामाच्या धारी त्या कोंबाला जीवदान देवू पाहतात.
तितक्यातच, कोणी त्या जमिनीवर 'प्रेम' नावाच्या झाडाचं रोपण करत.
अन् ते कोंब त्या सावलीत खुशाल वाढत जात...!
~ ©शरयू जाधव पाटील🌸
-
"कृपया पादत्राणे बाहेर काढावी, तुम्ही कोश्यारी नाहीत."
मंदिराच्या बाहेर पाटी लावण्यास हरकत नाही!
-
न अपेक्षा मला कुण्या देखण्या रुपाची ..
नको लाजरे इशारे नसतात जे मनी
नको भिजलेली चिंब सर शहार्याची
अन् नको कुठले सुख जे गतिशील या जगाशी.
माझिया मना असे एक सुप्त आशा,
जसा शित यामिनीस कुजे काजवा..
जिथे रंग उधळी मुक्त सवितेची संध्या
तिथे अकल्पित एक 'चाफा' मिळावा!
-
प्रश्न फक्त त्यांच्या समजुतीचाच आहे ना?
सोडा!
सगळं सोडा.
आपण आता आपलं जगू.
-
तु पाहिलेस निरखुन किती माझ्यातले अनोळखी रस्ते.
'सापडेल एक रस्ता तुझ्यापर्यंत जाण्याचा ' या एकच आशेवर.
मी ही ठरवलेलं,
'तुझ्यापासूनच तुला शोधण्याची मुभा '
या एकच अटीवर.
-
बाईच सौंदर्य फक्त त्या एका क्षणापर्यंत असत जिथे ती समोरच्याला प्रेमात पाडते.
बाकी नंतर सौंदर्य महत्वाचं राहत नाही, पाहिला जातो तो फक्त स्वभाव.-