माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..
"का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"?
.😊😀
आंबा कसा खायचा,
इतकीच माझी विचारणा होती..🤔
तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔-
प्रिय सर्वांचा आवडता आंबा,
फळांचा राजा म्हणजे आंबा. आंबा म्हटले आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते फळ आहे. आंब्याला मोहोर आल्यापासून ते पिवळा धम्मक आंबा दृष्टीस पडेपर्यंत सर्वांची नजर त्या आंब्याकडे लागलेली असते. पूर्वीच्या काळी प्रत्येकांच्या शेतात एक तरी आंब्याचे झाड असायचे त्यामुळे मुबलक प्रमाणात आंबे खाण्यास मिळत असत. पण आज शेतातील वृक्ष तोडण्यात आली त्यामुळे आंब्याची झाडं देखील कमी झाली. आंब्याच्या झाडांच्या समुहाला आमराई असा उल्लेख केला जातो. तशी प्रत्येक गावात एक आमराई नक्की असायची पण तेही आज नामशेष झाले आहे. आजच्या काळात लोकं आंब्याला व्यावसायिक स्वरूप आणून शेतात आंब्याच्या झाडांची कलम करून शेती करत आहेत. गावरान आंबा बाजूला होऊन आज वेगवेगळ्या नावाची आंबे बाजारात येत आहेत. आंब्याच्या झाडाला दगड मारून कच्या कैरी पाडण्याचे दिवस आज संपले आहेत. आज आंबा विकत घेतल्याशिवाय मिळत नाही. आंब्याचा मोसम सुरू झाला की प्रत्येकांच्या घरात रसाळीचा कार्यक्रम सुरू होतो. पहिली रसाळी जावयाला खाऊ घालण्याची प्रथा आज ही कायम आहे. खास करून मुलगी आणि जावयाला रसाळी कार्यक्रमाला आमंत्रित केले जाते आणि त्याचा मनमुराद आनंद लुटला जातो. पुरणपोळी आणि आंब्याचा रस याच्या जेवणाचा स्वाद काही वेगळाच असतो. आंबे चोखून खाण्यात जी मजा येते ते आंब्याचे रस पिण्यात कधीच येत नाही. आम्ही लहानपणी रस कमी पण आंबा खायचो-
फळांचा राजा आंबा
म्हणून तुझाच सर्वत्र मान...
चवीमध्ये ही तुझेच सर्वत्र
नेहमीच अव्वल स्थान...
पायरी, हापुस, तोतापुरी,
लंगडा,रायवळ आणि दशेरी...
कच्च्या आंब्याची चवच न्यारी
लोणचे रूपात सदाच घरोघरी...
पन्हे असो वा आमरस
माझा असो वा फ्रुटी...
चवीमध्ये आंब्याच्या ना
कोणत्याच हो त्रुटी...
पिढ्यानपिढ्या राहून अमराईत
कधी सावली कधी पक्षांना देतो निवारा...
कधी सातासमुद्रापार जाऊन
आपल्या गोडीने ओलांडतो किनारा...
देऊन आपल्याला गोड गोड आंबा
देत असतो तो एकच संदेश...
खाऊनी आंबा रुजवा कोय जमिनीत
निसर्गाचाही समजा आहे हाच आदेश...-
काल १ हिरवा आंबा आणला...
आज त्याचा रंग भगवा झाला..!
परीवर्तन निसर्गाचा नियम आहे..
जे हिरवे आहेत त्यांना भगवे व्हायचेच आहे...
आणि...
जे आंबे हिरवेच राहतात.
त्यांचं आम्ही लोणचं घालतो..!!
😆🤣😆
जय हिंद 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩-
अक्षयतृतीया घेऊन आली आंबा
खूप म्हणजे खूप आनंद झाला...
रविवार स्पेशल बेत म्हणून आज
आमरस पुरी चा फडशा पाडला...-
सर्वफलं श्रेष्ठम
आस्वादं मधुरम
पीत-हरित सम
अविट रसाळम
खावा कुटुंबासवे
वसंतदूत आम्रं ।-
आंबा
निरनिराळे आंबे बाजारात आले.
सजून सवरुन तयार झाले.
एक आंबा आंबट निघाला,
मीठ मसाल्यात पुरला गेला.
त्याचे मस्त लोणचे केले, बरणीमध्ये भरून ठेवले.
एक आंबा म्हणाला थांबा मला गोड साखरेत बुडवा.
त्याच्या छान मुरब्बा केला बरणीमध्ये साठवून ठेवला.
एक आंबा रुसला, कुकरमध्ये जाऊन बसला.
उकडून त्याचे पन्हे झाले, सर्वांनी मिळून पोटभर प्याले.
बाकीचे आंबे पेटीत बसले, विक्रीसाठी तयार झाले.
काहीचे झाले आम्रखंड, काहीचे झाले आम्रपोळी.
काहीचे झाले गार गार आईस्क्रीम, तर काही म्हणाले रस शेवई.
आमरस पुरीची मज्जाच वेगळी, लहान सहान सर्वांना भोवली.
काही म्हणाले कच्च्या आंब्याची आमटी बनवून.
काही म्हणाले असंच चोखुन खाऊ.
सर्वांची हौश भागवून आता आंबा निघाला दूर देशी.
पुढील वर्षी मे, जुनच्या सुट्टीत जावे सगळ्यांनी आजोळी.
अशी आंब्याची मज्जाच न्यारी.
मोठी, लहान सर्वांना आवडतो भारी.
मेथ आंबा, आमटी मुळे वाढते जेवणाची लज्जत भारी.
-
वसंत ऋतूत जेव्हा निसर्ग खुलतो
आम्र मोहोराचा दरवळ पसरतो
उत्सुकता सर्वांना हापूस आंब्याची
कोकीळ शुभ शकुनी सूचित करतो
इटुकल्या पिटकुल्या कैऱ्या लोंबती
कैरीचे पन्हे क्षमवते थोडी तहान
आम्र छायेत बैठक राखणदारांची
कैऱ्या पाडण्या जमते फौज लहान
तोतापुरी, राजापुरी, नीलम, केशर
चैत्रात आमरस पुरीचा बेत घरोघरी
फळराजा हापूस आंबा खाई भाव
कोकणचा आंबा परदेश वारी करी
लोणचे, छुंदा, चटणी, साखरांबा
स्विकारा हो आमंत्रणाचा मान
कोशिंबीर, भजी, वडे, पुऱ्यांचे ताट
आमरस मेजवानी झाली न छान
साजरे उत्सव, सण, समारंभ खास
सुग्रास जेवण येईल सुस्ती थोडी
आपल्यांची भेट व्हावी मनी आस
सहभोजन नात्यात आनंदाची गोडी-
सध्या कुठे आहेस रे...?
तुझ्याविना जीव वेडापिसा
बघ कसा होतोय रे...?
आधी झाडावर भेटायचास
नंतर हळूहळू पेटीत
दर्शन द्यायला लागलास,
गोड गोड, साखरेसारखा!
हापूस असो की पायरी
तू साऱ्यांनाच आवडू लागलास...
तुझ्या आगमनाची!
आम्ही दरवर्षी वाट पाहायचो,
कधी चाखायला मिळेल ?
या आशेनं नुसतं झुरत राहायचो,
मग कोकणातून काका, मामा
आठवणीनं पाठवून द्यायचे...
अस्सल कोकणातला हापूस!
मग त्या रसरसलेल्या हातानं
खाताना जो काही "स्वर्गीय"
आनंद यायचा त्याला तोड नसायचा,
ते सारं आठवलं की,
आजही तोंडाला पाणी सुटते रे...
फळांचा राजा तू
सध्या कुठे आहेस रे...?
तुझ्याविना जीव वेडापिसा
बघ कसा होतोय रे...?-
पाहताच आकर्षण झाले मज
हातात घेताच मधुर सुगंध दरवळला
मनाला क्षणभरही राहावले नाही
असा आंबट गोड मी आंबा चाखला...
😍😍😍😍😍-