गौतम बुद्ध
माझा भगवान गौतम बुद्ध
त्यांचे उपदेश आहेत शुद्ध
लोकांचे पाहून यातना दुःख
त्यागिले राजवैभवाचे सुख
आपल्या संसाराचे पाश तोडून
भव्यदिव्य ऐश्वर्य दिले सोडून
मिळविले स्वतः आत्मज्ञान
दिले सर्व लोकांना तत्वज्ञान
कोण्याही शत्रूस जिंकावे प्रेमाने
आम्हा शिकविले गौतम बुद्धाने
उपदेश देऊनी सकलजणाला
डाकू अंगुलीमालला संत केला
किती शांत दिसे बुद्ध मूर्ती
पसरली पहा जगभर कीर्ती
बुद्ध म्हणजे दया क्षमा शांती
त्यांच्या विचाराने होई क्रांती
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769-
गम के ये आसू दोस्त के साथ पी ले
ये अनमोल जिंदगी ना मिले दोबार... read more
अर्धांगिनी
तिच्या आगमनाने माझ्या
संसाराला मिळाला सहारा
माझी अर्धांगिनी नाही तर
ती माझ्या पतंगाचा दोरा
मी उडतो उंच आकाशात
तिच्या अनमोल सहकार्यामुळे
मला फुटले आशेचे पंख नवे
तिच्या कौटुंबिक आधारामुळे
माझ्या संसाराचा हा गाडा
तिच्याविना चालविणे अशक्य
सुखदुःखात तिची सदा साथ
म्हणून होतेय अशक्य ते शक्य
मला आणि माझ्या कुटुंबाला
तिने सुखाचे काही क्षण दिली
म्हणून माझं आयुष्य तिला लाभो
हीच एक मागणी देवाकडे केली
- नासा येवतीकर, 9423625769
-
तुला आठवतंय का माझी नि तुझी
पहिली भेट कशी झाली ?
नसेल आठवत तर डोक्याला जरा ताण दे
ते पावसाळ्याचे दिवस आभाळ भरून आलेलं
छातीत पुस्तकं कोंबून तू रस्त्यावर जात होतीस
त्याच वेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला
तुझी भिरभिरती नजर माझ्यावर पडली कारण
माझ्याकडे छत्री होती
क्षणाचाही विचार न करता माझी छत्री दिली तुला
पुस्तकं भिजू नये नि तू पण
मी मात्र पावसात भिजत चाललो तुझ्या सोबतीने
मला नव्हती काळजी कशाची
थोड्या वेळाने पाऊस थांबला माझी छत्री परत मिळाली
सोबत थँक्स चे दोन शब्द ही
मी अजूनही विसरलो नाही
आपली ही पहिली भेट
कदाचित तू विसरली असशील-
वेदना मनातल्या ओठावर येऊ दे
डोळ्यांत साचलेले अश्रू गळू दे
डांबून ठेवू नको दुःखी प्रसंगांना
जिवलग मित्रांना मोकळं सांगून दे
सुख वाटल्याने वाढत राहतात
दुःख सांगितल्याने कमी होतात
एकांतवासात असा लपू नको
चारचौघाना तुझा त्रास कळू दे
-
🌼 ★ 🌸 विचारधारा 🌻 ★ 🌺
समाजात आपला सम्मान व्हावा असे वाटत असेल तर आपल्या जवळ ज्ञान असले पाहिजे. ज्ञान मिळविण्यासाठी स्वतः जवळ श्रध्दा असली पाहिजे. श्रध्देशिवाय ज्ञान मिळत नाही. ज्ञानामुळे आपल्या अंगी नम्रता आली की समाजात मान मिळतो. आपली योग्यता आपल्या जवळ असलेल्या ज्ञाना वरुन कळते, त्यावरूनच समाजात स्थान मिळते. वरवरचे ज्ञान आज न उद्या उघड होते. त्यामुळे श्रध्दापूर्वक सराव केले तर सखोल ज्ञान मिळविता येते.
📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769-
*🌼🌸 विचारधारा 🌻🌺*
माणसाच्या जीवनात दोन गोष्टी अत्यंत त्रासदायक असतात एक म्हणजे नशीब चांगले असावे आणि वेळेच्या पूर्वी सर्व काही तात्काळ मिळावे असे वाटणे. नशिबात असलेली गोष्ट कधी ना कधी मिळणार म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही, तर त्यासाठी अथक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जे नेहमी प्रयत्न करतात त्यांना हमखास यश मिळते आणि वेळेवर मिळते, हे मात्र खरे आहे. त्यासाठी कधी कधी प्रतिक्षा करावी लागते आणि त्याचे फळ निश्चितपणे चांगले मिळते.
📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769-
•••••• विचारधारा ••••••
भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करत जीवन चांगल्याप्रकारे यशस्वी करता येते.
पण काही लोक नेमके याच ठिकाणी चूकताना दिसतात. भविष्य पाहणा-या लोकांवर विश्वास ठेऊन, आपले जीवन घडवण्यासाठी त्याच्यासमोर हात दाखवतात आणि अंधश्रध्देला बळी पडतात. असं जर हात दाखवून आपले भविष्य घडत असेल तर काहीच काम न करता नशिब बदलले असते. पण तसे काही घडत नाही.
तेच आपले हात चांगल्या कामासाठी सदैव पुढे केले तर नक्कीच चांगल्याप्रकारे आयुष्य बदलण्यास संधी मिळेल.
📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••-
•••• आजची विचारधारा ••••
कपड्याना अत्तराने सुंगधित करता येते, त्यामुळे आपल्या अंगाचा वास येत नाही असा विचार करून आपण अधुनमधून वास घेत असतो. म्हणजे आपल्या मनात कुठे तरी शंका येत राहते.
पण दूसरा एक व्यक्ती असतो ज्याच्या अंगावरचे कपडे सुंगधित तर नाहीत शिवाय खुप महागडे सुध्दा नाहीत तरी लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध इतराना आकर्षित करीत असतो.
📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769-
सण दसरा
आंब्याच्या पानांची केली कमान
दारावर सजली नि वाढवली शान
पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार
देवाच्या गळ्यात शोभतो फार
अंगणात काढली छान रांगोळी
खायला केली गोड पुरणपोळी
आपट्याच्या पानाला सोन्याचं मान
आपल्या माणसाचे होई मानपान
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा
होतो असा प्रत्येकाच्या घरी साजरा
- नासा येवतीकर, धर्माबाद-