✍️✍️काव्यसुमन.. (आशु)   (सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे.)
957 Followers · 644 Following

read more
Joined 15 October 2018


read more
Joined 15 October 2018

आजकाल सोशल मिडीयाने सर्वांनाच काबू केले आहे... लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईलच्या आहारी गेले आहेत... केला तर मोबाईलचा चांगलाही उपयोग करता येतो... पण तेवढे प्रत्येकाचेच स्वतःवर नियंत्रण ही हवे ना?... मोबाईल शाप की वरदान?... याचा विचार केला तर नक्कीच कळेल...त्यामुळे वेळ आणि संधी आहे तोवरच त्याचा योग्य वापर करून घेणे कधीही चांगले... हो ना?...

-



आई जेवढ्या कळा सोसून बाळाला जन्म देते... तितक्यात कळा बापालाही आजन्म सोसाव्या लागतात... एक कर्ता पुरुष म्हणून... एक नवरा म्हणून... एक मुलगा म्हणून... एक बाप म्हणून... स्वतःचे सारे त्रास बाजूला ठेवून... इतरांसाठी त्याला नेहमीच खंबीर उभे रहावे लागते... कधी परिस्थितीसोबत... कधी स्वतःसोबत... कधी वेळेसोबत... तडजोड करून... हो ना?...

-



लोकांची सवयच असते... नेहमी पाय ओढायची... आपले सोडून इतरांचे पहायचे... नुसते म्हणतात... दगदगीचे युग आहे... पण ते फक्त त्यांच्या सोयीनुसारच असते... मनाजोगे करायला तर खूप वेळ काढतात... पण एखाद्याने त्याच्या गरजेवेळी हाक मारली की मात्र आता वेळ नाही... नंतर पाहू बोलतात... आणि तीच वेळ त्यांच्यावर आली तर मात्र मदतीची अपेक्षा करतात... बरोबर आहे का हे?...

-



बऱ्याच वेळा मनुष्याच्या मनाची अवस्था ही फक्त त्यालाच माहीत असते... बाहेरुन वरवर हसणारी मने आतून खूप दुःखीही असू शकतात... कधीकधी चेहऱ्यावरुन दुःखी उदास वाटणारी माणसे मनातून खूप आनंदी असतात... हे कळत कधीच नाही... कारण एकच अजून तरी कोणालाच कोणाचे मन वाचता येत नाही...बरोबर ना?...

-



काही वेळा मन अशांत असते... एकाकी असते... अशावेळी कोणी समजून घेणारेही नसते... अशा प्रसंगी फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा... आणि शांत रहायचे

-




पाहता मी तू दिलेला सोनचाफा
आज भरतो आठवांचा खास ताफा


-



आज झाली फार मोठी चूक माझी
चोरते त्या भाकरीला भूक माझी

पाहिलेले लोचनांनी सर्व काही
पण तरीही संमती ती मूक माझी



-



भले असू दे तुझी माझी मग रास वेगळी
पुन्हा लागली बघ जगण्याची आस वेगळी

विरहानंतर आज भेटलो दोघे आपण
भेट अचानक ठरेल अपुली खास वेगळी

वाट्यास नको विरह सततचा असा नव्याने
म्हणून आता धरली आहे कास वेगळी

-



कैसा कहर
तुम्हे देखकर ये
हुआ असर

-



तिळगुळ घे...

तिळगुळ घे अन् गोड बोल तू
राग सोडुनी भाव खोल तू

बाळगायचा अहम कशाला
अहम फुकाचा मान फोल तू

नात्यांमध्ये अवीट गोडी
नात्यांसोबत जरा डोल तू

चल आकाशी पतंग उडवू
करु नको ना उगा झोल तू

आयुष्याच्या प्रगतीसाठी
वेळेचे तर जाण मोल तू

बिनकामाचा दंगा नुसता
वाजवू नको फक्त ढोल तू

आपुलकीचा जप ओलावा
ओलाव्याची बघ ओल तू

-


Fetching ✍️✍️काव्यसुमन.. (आशु) Quotes