बालपण होत आमच छान,
पिंजारुन टाकत होतो सगळ रान.
रानामध्ये जाऊन करत होतो फीस्ट.
क्षणादार्थ सगळ करायचो आम्ही फस्त.
अंगान बनलो होतो आम्ही धष्ट पुष्ट.
खेळ होते खुप मजेदार आवड होती त्यांची फार.
कधी सुर पारंबी, तर कधी चेंडुफळी
तर कधी लपंडाव, तर कधी पळापळी,
कधी हु तु तु , तर कधी विठीदांडी
कधी रुमाल पाणी, तर कधी सापसिडी.
दुकानात मिळत असे लिमलेटची गोळी
ती खाण्याची गंमत निराळी
सोबत असायची मित्रांची टोळी,
होती सारी मनान साधी भोळी
नव्हत कधी जात पातीच बंधन,
नव्हता कधी कपटी भाव, निरागस होत मन.
नसायच कधी मैत्रीमध्ये राजकारण.
मित्र आम्ही सारे एकमेकांचे जीव की प्राण.
पाहुन लहानांना, हरपते भान.
आठवून बालपण, प्रसन्न होते मन.
पुन्हा एकदा जगाव बालपण,
वाटुन जाते मनाला काही क्षण..-
आज त्या जुन्या आठवणींना
डोळ्यांसमोर आणायचं आहे मला ,
पुन्हा एकदा अनुभवायचं आहे
माझ्या हरवलेल्या बालपणाला.
त्या प्रत्येक छोट्या गोष्टींमागे
किती निरागस हसू हसायचं ,
द्वेष,तिरस्कार तर दुरचीच गोष्ट
मन हे कटूतेने भरलेलं नसायचं.
गोडवा असणारे शब्द माझे
कुठे हरवून गेले ?
येतील का ते शब्द पुन्हा ओठांवर माझ्या
ह्या विचाराने अश्रृ ओघळून आले.-
भिरभिरणारं बालपणं
मनसोक्त डुंबणारं
वा-यासोबत फिरणारं
मातीत मिसळणारं
थिरथिरणारं लहानपणं
पावसात भिजणारं
पाण्यासोबत वाहणारं
ओलचिंब थरथरणारं
खळखळणारं निरागस
क्षणातच हसणारं
क्षणातच रडणारं
पुढं मागं स्वैर धावणारं
सळसळणारं धडपडणार
मुक्तपणाणे विहारणारं
स्वछंदीपणे मिरवणारं
सा-यात राहून मागं उरणारं
ना थांबणार ना संपणारं
बेलगामं असं बालपणं
वयानं कितीही वाढलं तरी
मनातून नाचणार तुझं माझं
बालपण....
-
वयाने जरी मोठे झालोत
मनानी मात्र लहानच आहोत
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद आपण लुटुया
चला परत एकदा लहानपण जगुया ......-
आज मज वाटे
मी लहानगे व्हावे
बालपणीचे ते सोनेरी क्षण
पुन्हा पुन्हा जगावे-
तुझे माझे बालपण सोबतच सरले
आठवणींचे काही क्षण आज डोळ्यात उतरले,
चिडुन, भांडुन, रागावुन किती दुर जायची
सांग माझ्याशिवाय किती क्षण तु रहायची,
न भांडता तर कधी दिवस गेलाच नाही
पण तुला माझ्याशिवाय घास कधी गिळलाच नाही,
इतके वर्ष झाली तु मला सोडुन गेलीस
जिवंत असल्यासारखी तु -हदयात राहीलीस.
~ दिपक सव्वासे
-
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा...
म्हणतच बालपण
पुन्हा यायला हवा...
तो बालपणीचा
पाठशिवणीचा खेळ...
किती छान बसायचा
सार्या मित्र मैत्रीणींचा मेळ...
खोट्या खोट्या लग्नाची
किती चालायची लगीनघाई...
आम्हीच आमच्या बाल
दुनियेत रमून जाई...
किती छान असायचे ते
खोटे खोटे भांडण...
नसायचे कोणत्याच
गोष्टीचे हो बंधन...
बालपणी आम्हा वाटे
लवकर मोठे व्हावे...
पण आता मोठे झाल्यावर वाटे
ते रम्य बालपणच हवे...
-
लहानपणी खुप स्वप्न पाहिले होते, की मोठे होऊन मनमोकळे वागता येईल..
पण आता मोठे झाल्यावर स्वप्नांचा विचार करुन कळतं, आपण आपलं बालपण हरवून बसलोये..-
बालपण म्हणजे जुन्या आठवांचा
अमूल्य असा ठेवा
लहानग्यांना पाहताच आता
त्यांचा वाटतो मनी हेवा
दिवाळीची सुट्टी,मे महिन्याची सुट्टी
आता काहीच भेटत नाही
आता नुसतं कामात गुंतून
मजा काही येत नाही
दमून गेलोय आता खूप
ह्या धकाधकीच्या जीवनात
बालपणच छान होते
रोज येऊन जाते मनात
देवा थोड्या शहाणपणासोबत
थोडं बालपणही दे
पुन्हा एकदा लेकरांना तुझ्या
लहानगं होऊ दे
लहानपणीच्या आठवणींना
उजाळा देशील का रे पुन्हा?
भातुकलीचा डाव नव्याने
मांडशील का रे पुन्हा?
अजून काही मागत नाही
फक्त जुने दिवस परत दे
आयुष्याच्या हिंदोळ्यावर पुन्हा
बालपण अनुभवू दे
-
कितीक सुंदर आणि खेळकर होतं बालपण
हाक आली जरी आईची रहायचो लपून
रंगीबेरंगी छोट्या मोठ्या खिश्यात गोट्यांचा बाजार
विटीदांडूचा खेळ चाले आणि कितीक मजेदार
फाटकी पिशवी फुटकी पाटी लपलेला सुंदर रंगीत खडू
अभ्यासाचा कंटाळा म्हणूनी मिळायचा धम्मक लाडू
रानामधले चिंचाबोरांचे झाड आवडीचे होते
मधल्या सुट्टीत सारे सवंगडी तिथे धूम ठोकायचे
आईबाबा आणि गुरुजन खरंच होते छान
मारझोडूनी आणि शिकवूनी घडविले माझे जीवन-