नजरेला नजर भिडलीच तर
प्रेमात वगैरे काय ते पडशील
काय होतं आणि काय झालं
याचा विचारच करत राहशील-
या आभासी जगात नाती पटकन जुळून येतात,
पण ती टिकवणं आणि जपणं खूप कठीण असतं..-
तिची पाठमोरी आकृती,
तो पाहत राहिला दुरून..
मनाने घातलेली साद,
ओठांवरीच गेली विरून..-
तुझं हसणं मला,
नेहमी कोड्यात पाडतं..
नकळत माझं मन,
त्या कोड्यातच अडकतं..-
ज्या चूकांचं आपण मोजमाप करतो त्या चूकांच्या सुधारणेला वाव असतो...
-
जेथे आशा, ध्येय आणि स्वप्ने असतात..
तेथे संघर्ष, वेदना आणि वैफल्ये ही असतात..-
इच्छा श्रींची मोडू नकोस,
शपथ शिवाची तोडू नकोस,
असेल जग वाईट, घाबरू नकोस,
अटकेपार झेंडे लाव पण,
मायमराठी सोडू नकोस..-
स्वतःच्याच राज्यात,
पाहुणे बनून राहू नका..
महाराष्ट्रात मराठीतच बोला..-
समुद्राच्या छाताडावर महाराजांचे,
पुतळे उभारणे ठिक आहे,
पण भंगलेल्या गड-किल्यान्नाही,
जीर्णोद्धाराची प्रतीक्षा आहे.!!-
या अंगाला बोचणाऱ्या थंडीतही,
जर तू माझ्यासोबत अख्खी रात्र मरीन ड्राईव्ह वर बसून गप्पा मारायला तयार असशील, तर तुझं प्रेम स्वीकार आहे मला 😋-