आठवण तु माझ्या मनाची...
साठवण तु माझ्या प्रितीची...
कधीही विसरणार नाही मी...
या आपल्या दोघांच्या आठवणी...
कारण...
हिच तर शिदोरी आहे माझ्या आयुष्यभराची...
-
शब्दांना दिलासा दिला तरीही
मन आतुन खूप रडत होत,
माहिती नाही का ? पण ते फक्त
त्याचीच आठवण काढत होत......-
आठवणी
खरंच तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यांइतकी
तर साखरही गोड नाही...-
मनापासून वाटत....
मनापासून वाटत एका संध्याकाळी कुठेे तरी शांतपणे बसून तुझ्यासोबत खुप बोलाव...
मनापासून वाटत पाउसात तुझ्यासोबत खुप भिजाव ...
मनापासून वाटत तुझ्यासोबत खुप हसाव...
मनापासून वाटत तुला मनातल सगळ सांगाव...
मनापासून वाटत फ़क्त तुला बघत राहाव...
मनापासून वाटत तुझ्यासाठी खुप काही कराव...
मनापासून वाटत मला तुझ्या लायक बनाव..
मनापासून वाटत तुझे सगळे हट्ट पूर्ण करावे..
मनापासून वाटत कायम तुझ्या सोबत राहाव..-
या अगणित तार्यांच्या बाजारात
मी तुला रात्र रात्र शोधते
दिसत नाहीस तू म्हणून
चंद्रावरच तहान भागवते-
आठवण तुझी आली तेव्हा
खूपदा I miss you दगडावर लिहिले ....
फक्त...
फेकून मारण्यासाठी लिहून लिहून
हातात त्राण नाहीत उरले....🤣-
सध्या तर मला छळत नाही....
तुझे बदलने मी आता इक्सेप्ट केलेय ....
तु असलास नसलास तरी फरक मी
स्वःतावर पाडत नाही....
कारण तुझे असने एक छलावा होते
जे फक्त माझा वापर करून
घ्यायला आणलेले नवे सोंग होते ...-
आठवण तुझी मी जपलेला भाव असतो
मी साठवलेल्या आठवांचा गाव असतो
मनाच्या दारात ये जा ये जा करणारा
तू घेतलेल्या काळजाचा ठाव असतो
मलाही वाटतं तू मनांत माझ्या राहावं
जावून येणं, तुझा प्रेमळ डाव असतो
तू नसताना जवळ, उचकी वेदना देते
तुझ्या आठवांचा तो, गोड घाव असतो-
बहू गोड मधाळ जणू थेंब तो भासे मधाचा
आठवण तुझी येता थबकतो क्षण दो घडीचा
हातात घालूनी हात गतक्षण चालता सोबती
सुंदर महल आठवांचे एक एक द्वार उघडती
रम्य सुख संपन्नता मोहवते जशी विद्या मोहिनी
याहूनी मौलिकता का दुजी सांग माझ्या जीवनी
विरह ना दुरावा जरी लाभली साथ सोबतीची
वेडा छंद स्मृतीस टिपणे उजळणी गेल्या क्षणांची
-
आठवण तुझी येताच
त्या कोऱ्या कागदावर
पुन्हा पुन्हा जन्म घेते
तीच जुनी कविता
शब्द न् शब्द तोच असतो
भावार्थ असतो मात्र वेगळा
करूणेची ती करुण कहाणी
प्रत्येक कडव्यातून जाणवते
हरवतात असेच काही शब्द
भावनांची पानगळ होत राहते-