सावळ्या रंगात मेघ सावळे रंगले
अजून वेळ आहे नभ असे दाटले
नाव उभी होऊनीया अचल स्तब्ध
प्रतिबिंब जळी स्थिर माझे उमटले
डौलात येथे शांत लयबद्ध तरीही
निरव डोही कंकण वलय तरंगले
प्रतिक्षेत उभा मीन गळी लागण्या
कार्यात रम्य या मन सहजी रमले
काळ वेळ थांबला माहौल येथला
विसरूनी भान सारे चित्त हे दंगले
http://marathikavita.co.in/marathi
-kavita-others/t31824/new/ #new-
हि नावं शोधत आहेे किणारा
कुंणीकडे कशासाठी
भेटेल तिला ध्येय तिचे
कधीतरी कुठेतरी
कदाचित असेल तिचा कावा
सरीतेत बुडण्याचा
पण प्रवासी तिचा हरामखोर
म्हणे मी तर अंत तुझा
बुडवण्या निघालो संसार
तूझ्यासकट कधीचा ?
पण अजुन वेळ आहे़...-
घडेल का कधी असे
सौख्य दारी नांदेल
स्वप्न समोर येऊन
अस्तित्वाचे तिमीर देईल..
घडेल का कधी असे
जे पाहिजे ते मिळेल
सुखाचा येईल का किनारा
अंधारलेली रात्र कधी दुर होईल..
घडेल का कधी असे
तो देव येऊन दर्शन देईल
खुप केले सहन आता
अजुन किती संयम ठेवशील..
घडेल का कधी असे
क्षण ही थांबेल
भूतकाळात हरवलेल्या वाटा
पुन्हा वर्तमानात आणता येतील..-
दरवेळी तुम्हाला तुमच्या प्राप्त क्षमता साथ देतीलच असे नाही, त्यामुळे योग्यवेळी तुम्ही तुमच्या क्षमतांचा विस्तार करणे हे सामंजस्याला अनुसरून आहे.
-
अर्थमय गीत हाेईन म्हटलं
पण शब्दच सापडत नाही
निखळत्या सुरांना छेडावं तर
वाद्याची तार सापडत नाही
मग ती वेळ छळतेच की हाे !
जिने असं गाणं लिहून ठेवलं
जे कधीच गाता येणार नाही
मग अट्टाहास कशाचा करू......?-
जीवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो
कारण काळ जे शिकवतो
ते कोणीच शिकवत नाही-