ती नुसतीच हुलकावण्या द्यायची,
मनात विचार एक चालायचा;
अन् प्रश्न विचारला की उत्तरं
अंधाधुंद द्यायची...
पण खरच "ती"गोड होती,
त्या "मिठाई"सारखी, जी आई;
मी पास झाल्यावर चाळीत वाटायची...-
ती
ती रूसते, भाडंतेय, अपेक्षा ठेवतेय,
हक्क गाजवतेय,भरभरून बोलतेय,
तो पर्यत ती तुमची आहे,
ती हे सर्व सपंवून ती जेव्हा फक्त हंसेल,
आणि व्यक्त होणे टाळेल, तेव्हा तीला तुम्ही
गमवलं,
ती फुलपाखंरा सारखी नाजुक
फुलांच्या सुगंधा सारखी दरवळ
तीच्या भावनाना अति अलगद हातळावं
ती कणखर ,ती गंभीर,धाडसी,आणि गुढ्ड,
पण तीला जपाव म्हणून ,पुढाकार घेऊन
कवेत घ्यावं, मनात आलं ही पण तीला आवडेल,
की तीचा जीव गुदमरेल ,
काय कराव, कसा विश्र्वास बाळगावं तीच्या अतंरी
ती समजायला सोपी पण ,कळूण घेयला अवघड
असीच असतेना ती,
पण तीचा विश्र्वास हवाय मला माझ्या वर बस?
-
एखाद्या माणसाचा स्वभाव खराब आहे अस म्हणून आपण त्या माणसासोबत बोलायचं टाळतो,पण स्वभाव खराब असणारा प्रत्येक व्यक्ती खराब नसतो,काहीजण काही जण मनातून चांगले पण असतात, पण त्यांची परिस्थिती त्यांना स्वभाव बदलायला भाग पाडते..
-
एखाद्या अनोळखी व्यक्ती सोबत थोडा वेळ सवांद
साधून झाल्या नंतर आपल्याला एक प्रश्न विचारला जातो
तो म्हणजे ,, 'तुझे वडील काय काम करतात'? म्हणजे
त्यावरून आपली गरीबी किंवा श्रीमंती समजली जाते का??? खरच मैत्री करायची असेल तर गरजेचं आहे का हे विचारणं?
🙏-
पारदर्शी मनाला कशाला हवा आरसा
बरोबर चालवतील ते आपला वारसा
चंचल मनाचा पण काय ठेवा भरवसा
भरकटत गेलं की आपलं नसतचं जसा
मनात अनेक कल्पना पण पोकळ तो वासा
अलगद जपाव्या वाटतात जशाच्या तशा
पण लावावा लागतो लगाम उगाचं नको आशा
पदरी पडले नाही तर उगाचं निराशा
-
मनातली वादळं वरकरणी कितीही शांत दिसत असली तरी आतून मात्र ती धुमसतचं राहतात.....इतरांना त्याचा काहीच त्रास होत नसला तरी स्वतः मात्र आतून धगधगता ज्वालामुखी असतो.......
तात्पुरतं शिंपडण थंडाव्याचं झालं तरीही...आपल्या आतला शेवटचा कण मात्र अजूनही ज्वलंत च राहतो..
मनःशांती मात्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला हवी असते....तरच ज्वलंत कणाकणांमधून भविष्याची फुले फुलतील...अन्यथा निर्जीव ज्वालामुखीचाच उद्वेग होईल..
-- के.ज्योती-
अंधारले आकाश भयाण
मनी दाटली रात्र सारी
तुझ्या शितल प्रेमाचे दव
चांदण शिंपडीत येई द्वारी ।।
श्वेत शुभ्र पडसाद नभाचा
मऊ मुलायम तो बोळा कापसाचा
उघडून तव पापण्यांचे पडदे
साकारली नव द्रुष्टी न्यारी ।।
कुठे तारे,टिमटिम करती,
कुठे चंद्रकोर लखलखती
तुझेच सारे रंग कुंचली,
तव रूपाचीच हि चित्रकारी ।।
हे रंग नव्हे,हे भाव
बोलती अबोलिक भाषा
चेतले सारे रम्य,सारे अगम्य
धन्य स्रुष्टी तव कलेची जादुगिरी ।।-
वहीच पान
आज मला या वहीच्या जुन्या पानाकडे बघून
जरा वाईट वाटले,
का बरं मी याच्या कोऱ्या करकरीत आयुष्यामध्ये
शब्द नाही लिहले,
पण चिंता नको करू रे "पाना",
तुझे जन्माला येणे मी व्यर्थ नाही घालवले ,
मी आज माझ्या कवितेचे शब्द तुझ्यावरच उतरवले...🙏-
भेटला अचानक तू जीवनाच्या अशा नाजूक वळणावर
कळलेच नाही मला कधी धरलास अंकुश माझ्या ह्रदयाच्या रथावर,
तुला बघता,तू पाहिल्यावर लगेच नजर चुकवितांना तुझ्यावरून
झाल्या किती वेदना माझ्या बंध मनाला आतून,
तू जवळ नसतांना नजर शोधत तुला होती,
दिसता तू समोर मी तुझ्यातच हरवून जात होती,
माझ्या रसहिन आयुष्यात अम्रुताच्या सरी म्हणून बरसला
कधी कळले का रे तुला मी तुला माझा म्हणून मनात मिरवला,
नाही म्हणाले शेवटपर्यंत तुला, माझ्या ह्रदयाने ही दारं फक्त तुझ्यासाठीच उघडली
कशी सांगणार होते मी, तुला गमविण्याच्या भितीने पुन्हा मागे वळली.-
त्याच्या चुका दाखवत
तिने आपली वाट मोकळी केली.
"तो" मात्र आजही त्याजखमांसवे
तसाच सलत आहे.-