ज्ञानेश्वरांनी जर एकविसाव्या वर्षी समाधी घेतली तर आपल्या सारख्या शुद्र बुध्दीच्या लोकांनी निदान वयाच्या चाळीसाव्या वर्षी तरी आपण जन्माला आल्यापासून काहीही ज्ञानप्राप्ती किंवा समाजोन्नती केलेली नाही एवढं उमजल्यावर आयुष्य का संपवु नये.
-
ज्ञाना म्हणे आत्मा , आहे सर्वत्र जागा
माणसानेच जपावा , माणुसकीचा धागा.-
प्रयत्न न करता
सहजपणे मिळेल अशी
कोणते ही वस्तु या भूतलावर
अस्तित्वात नाही
---संत ज्ञानेश्वर-
काही माणसांचा स्वभाव समजायला वेळ लागत असतो, हेच बघा की,आपल्या पेक्षा काही मोठं काम केल की ते आपल्याला आनंदाने सांगता कि अहंकाराने हे लवकर लक्षात येत नाही,
बहुंताशी माणसं दुसऱ्यांसमोर देखावापणा करायलाच स्वता:च काम करतात,
या कॅटेगिरीतली ही लोक ,साक्षात परमेश्रवर जरी सांगायला आला ' बाबा रे स्वता साठी काम कर आणि आनंद घे ,तरी ही लोक आपल्याच तत्वाला चिटकुन राहतील ...या लोकांशी जवळीक न ठेवण हेच लाभदायक ...
-
त्याच्या मायबापाला न्याय्य न देणारा विठ्ठल इंद्रायणी काठी जयाने मुखात कैद केला ...
विवेकाची मुर्त जो ज्ञानेश्वरी ज्ञानामृत पाजूनी सबंध वैष्णवांची माऊली जहाला..
उगाच लेऊनी अबीर गोपीचंद भाळी कौतुका पायी मिरवू नको ह्या वारकरी पंथाला ...
मुखवटा आहे ह्यो सगळा जात धर्मास बांधील तु पुन्हा षड विकारांची वाट चालायला...
तुझ्याअंतरी तो विद्रोही ज्ञानदेव शोध जो मार्ग दावेल खऱ्या मानवतेचा ह्या निर्दयी समाजाला ...
कपाळावरचा अबीर काळा गहिवरुन मस्तकाशी असं काहीतरी बडबडू लागला...-
सगळं कसं अवघड अन् मनाविरुद्ध घडत असेल तर लक्षात ठेवा
त्याचा जन्मच त्याला जन्म घेताच मारण्यासाठीच घडवलं होत
मध्यरात्री भर पावसात आईपासून दूर जावे लागलं होत
लहानपण गरिबीत अन मृत्यूच्या धोक्यात गेलं होत
असंख्य संकट पार करूनच त्याचा ज्ञानसागर बनलं होत
तुमच्यावर पण संकट आली की समजा ज्ञानाचा मार्ग खुला होतोय
फक्त कृष्णासारखा दोस्त, सारथी, मार्गदर्शक लाभला की तुम्हाला अजिंक्य होण्यापासून कोणीच
अडवू शकत नाही.....
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या
जन्मदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा-
ग्रंथ हे गुरु असतात. ते कल्पतरू असतात. त्यांचे देणे ‘परीसापरीस अगाध’ असते. लोखंडाला सोन्याचे तेज प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यात असते. वाचनामुळे लाभणारे ज्ञान आणि आनंद खरोखर अनमोल असतात. व्यापार-उदीम सोडून शब्दांना देव मानून त्यांची गौरव-पूजा करणारे संत तुकाराम म्हणूनच ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका.” असे म्हणतात. आपल्या मराठीचे ‘अमृतातेही पैजा’ जिंकणाऱ्या बोलाचे कवतुक संत ज्ञानेश्वर करतात.
-