ना पास ती झाली
मी पास होऊन गेलो
प्रेम विषय होता अवघड मग मी
तिच्यासाठी नापास झालो !-
ऑनलाईन शिक्षणाचा नुसता बाजार मांडलाय,
लहान मुलगा अँड्रॉइड मोबाईल घेवून बसलाय,
आली रेंज गेली रेंज अशा नेटवर्क च्या नादात थकलाय...
ऑनलाईन शिक्षण झालं महाग,
मराठी शाळाला लावून आग..
लाखो पैसे खर्च करून प्रवेशासाठी गर्दी करतात,
गुणवत्तेला किंमत राहिली नाही शिक्षणाच्या बाजारात...
आदरयुक्त ,भीतीयुक्त शिक्षणाचा संपवून साठा,
ऑनलाईन शिक्षणाच्या इथं भरल्यात बाजारपेठा..
सूट- बूट,वह्या - पुस्तकं ,सहली
आणि महागड्या परीक्षा घेवून,भरतात त्यांची तिजोरी,
त्यांचे प्रकल्प पूर्ण करता करता पालकांची होते बेजारी
मोठेपणासाठी करू नका वाताहात,
मुलांचे भविष्य असते पालकांच्या हातात
ऑनलाईन शिक्षणाच्या नादात पडून भरू नका त्यांचे बंगले,
गुणवतापूर्ण,आदरयुक्त,भीतीयुक्त
शिक्षण नेहमीच चांगले...
मराठी शाळांना महत्त्व द्या,
उद्याचा चांगला नवजवान घडुद्या...-
*Dil sala Pregnant Sa Ho Gaya Hai ,
*Lagta Hai Ab Mohabbat Paida Hokar Hi Rahega-
शाळा💡📚📖📃📒📓🗞️🖋️🖊️✒️💸🌎🌍
शाळा खरंच काय असतं?
विद्येच भांडार असतं.
शिक्षक म्हणजे असतात गुरु😇🙌🙏
म्हणून आपण त्यांचा आदर करु.
कधी करत नाहीत शिक्षक शिकविण्याचा हेवा
म्हणूनच तर विद्यार्थ्यांना मिळतो ज्ञानाचा मेवा.
शाळा खरच असते छान म्हणून राखु आपण शाळेचा मान🙌❤️-
Diwali chya suttya tr
shalet astana milayachya
Ata fakt exam sathi PL milto...-
माझा शाळेतला बाक
बाकावरच्या कडू गोड आठवणी
कित्येक गोष्टी शिकवून गेला तो बाक
निर्जीव होता पण आपुलकी निर्माण केली त्याने
मला तोच बाक हवंय म्हणून धावून जाणे
खूप काही; असा तो माझा शाळेतला बाक.-
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही...
का नाही होणार, असा हा समाज,
कुठे गुरु राहीले, कुठे शिष्य राहीले आज,
धर्म म्हणतो आपण, पण कुठे पाळतो,
सहजच आपण माणसे, घरासकट जाळतो,
न्यायाधीश आता, न्याय नाही देत,
पक्षप्रवेश करुन, सर्व शुद्ध झालेत,
संसदेत विषय आता भाकरीचा,
कसा कधी निघत नाही,
कारण,
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही...-
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही,
शिकवणारे आता विकले गेलेत,
की विकणारे आता शिक्षक झालेत,
इंग्रजाळून आपण झालो का स्वतंत्र,
सापडले का कुणाला 'हरवलेलं पत्र',
अधीकचे तास होतात एक्सट्रा फी ने,
शिक्षणासाठी आता पालकांचे जी ने,
उत्तरं बरोबर असतातचं सारी
योग्य काय? असा प्रश्न पडत नाही,
कारण,
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही...-
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही,
आता नाही पडत शिस्त लावणारी छडी हातावर,
नाही येत बाईंना अभ्यास करा म्हणताना गहिवर,
कुठे गुरुजींना माहीत, नाही कुणाकडे कंपास,
कुठे कळते हेडमास्तरांना, चुकतो का तास,
आता 'व्हलू टिच' होतं मोबाईल सारं,
आपलं ते 'मूल्यं शिक्षण' कुठे गेलं बरं?
शाळेत म्हणायचो 'खरा तो एकची धर्म,'
आता नीट का स्मरत नाही,
कारण,
मंदीरात आता शाळा भरत नाही,
आणि शाळेचे मंदिर राहिले नाही..-