प्रत्येकाचे असते स्वतःचे एक आभाळ,
जगण्याच्या मैफिलीतले संस्कारांचे वलय!
मराठी माणसाच्या हृदयात मात्र,
नसतं कुणीच शिवशंभूंशिवाय!
वटवृक्षाच्या छायेत बहरताना तुम्ही,
विसरला नाहीत मातीचा सुगंध!
तलवारीच्या पराक्रमासोबत जपला,
लेखणीचा हळुवार बंध!
लहानगे असतानाच सोडवून घेतला,
आईने बाळमुठीतून पदर!
भोवऱ्याने खेळायच्या वयात,
नशिबाच्या भोवऱ्यात अडकलात अलगद!
बापाची माया होती सोबतीला,
आजीने दिले उत्तम शिक्षण!
जन्मजात चैतन्याने भिडलात,
न बाळगता कोणतेच भय!
-