तसं असावं मुक्त
जसं असतं आभाळ,
कुणी छेडावं कितीही
आपण उडावं बेभानं,
जशी गरूड घेतो भरारी
तशी असावी रं जिद्द,
झाला असेल पराभव
न मानावी कधी हार,
जिंकण्याची आशा मनात असावी
प्रवास आनंदात जाण्यासाठी
सगळी मेहनत असावी,
ध्येय नसतं महाग
फक्त झळ सोसायला हवी,
कुणी जाईल सोडून
तरी वाट चालायला हवी.
ही मनीषा घेऊन
चालायचं आहे,
शेवटी नशिबाला सुद्धा
झुकवायचे आहे.
© के स्वप्निल-
4 JUN 2018 AT 21:50
16 JAN 2018 AT 7:31