हरवले पुन्हा एकदा स्वप्नांच्या वाटेत
भरकटले मन विचारांच्या दुनियेत
थांबली पाऊले बघून दोन वळणे जिथे
आणि विसरले की ही वाट जाते कुठे....?
आले वाटेत कधी चढ,कधी उतार
पाठीशी खंबीर हिमतीचा आधार
चालत राहील वाट जाईल तिथे
पण प्रश्न एकच ही वाट जाते कुठे....?
शोधत राहील वाट,मिळेल याची खात्री
सुटलतील प्रश्न,नक्कीच मिळेल उत्तर
आहे आज इथे उद्या असेल मी तिथे
शोधत राहील फक्त ही वाट जाते कुठे....?
-
हूनर जिंदगी जीने का हमे ना सिखाना जनाब,
हम जिंदगी खुद्द की शर्त पर नही,
अपने मा बाप के दिये संस्कारो पे जिते है...!!-
शब्दांनीच भाव दिले,
आघात दिले ,अश्रू दिले
अन हास्य ही त्यांनीच दिले..
पापन्यालगतच्या पाण्याला
लपवणारे मनाचे गाव दिले
जेव्हा हरवले मी कधी
पुन्हा नव्याने जगण्याचे
आयुष्य हे नाव दिले...
शब्दांनीच जगवलं ,
शिकवलं, अनोख्या वाटेवर
नव्यानं चालायला शिकवलं....
शब्दांनीच अर्थ दिले,अन
जीवन सार्थ केले....
-
न उमगणाऱ्या माझ्या मनाला
स्पर्श आहे तुझ्या जाणिवेचा...
अनाकलनीय अश्या शब्दांतही
भास आहे तुझ्या असण्याचा...
-
क्षण निघून गेल्यावरच त्यांची किंमत कळते अन
मग अश्या वळणावर येऊन थांबत आयुष्य
जिथे चालायच तर असत पण वाट हातून निसटून गेलेली असते-
नापा है मेने मेरी जिद्द को तेरी हर हार में...
नापा हे मेने मेरी हर हार को तेरे हर इक आसूमें...
नापी हैं मेने मेरी जींदगी तेरी हर मुस्कान में...-
वाटलं आज सहजच एखादी छानशी भेट दयावी तुला,
पण नंतर माझी मीच विचारांत पडले....
जिने मला माझं "आयुष्यच भेट "म्हणून दिलंय
तिलाच मी अशी काय भेट देऊ शकणार...?
माझं आयुष्य जरी दिल तरी ती भेट छोटी पडेल...-
जेव्हा प्रश्न स्वतःच्याच
अस्तित्वावर येऊन थांबतो...
तेव्हा कुठं जागा होतो
अभेद्य जिद्दीचा आत्मविश्वास...-