तिच्या भावनांचा पसारा, तिनं आवरायचं ठरवलं ...
भरकटलेलं मन तिचं, तिनं सावरायचं ठरवलं...
-
गंमत करून माझी, ज्याने त्याने लावले आपल्या परीने अर्थ...
गंमतीचा भाग मी, हसलो नाही तर गंमत ठरेल व्यर्थ...
-
इच्छा मनाची,पावसाचा एक थेंब व्हावं...
तुझ्या भल्यासाठी,मातीत मिसळून जावं...
-
जखमा पुन्हा ओल्या झाल्या,गहिवरले मनही आठवलेल्या क्षणांनी...
किती आणाभाका घेतल्या होत्या,एकमेकात गुंतलेल्या मनांनी...-
भेट वर्षाची...
जाणार्या वर्षाने येणाऱ्या वर्षाला शेवटच पाहिलं...
सांगायच खुप काही होत पण वेळ अभावी राहिलं...
होईल सुखाचा वर्षाव,जातील दु:ख पळून...
फक्त पुढं जाताना बघत जा मागे वळून...
-
विचारांचे थैमान
अचानक आलेल्या विचारांच्या वादळाने मनाच्या किनारपट्टी वर थैमान घालण्यास सुरुवात केली असुन मनाचा मेंदूशी असलेले संपर्क तुटला आहेत.त्यामुळे भावना,प्रेम,मैत्री,आपुलकी या पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच प्रमाणिकपणावर संशयाची दरड कोसळून मानसिक त्रास वाढला आहे. या सगळ्या परीस्थितीतून मार्ग काढण्यासाठी संवादाची गरज आहे.अन्यथा विचाराचे वादळ तिव्र होऊन मानसिक व भावनिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मनाचा अंतर मानाशी किंचित संपर्क झाल्याने माहिती मिळाली आहे.
-
कालच्या पिण्याचं कारण तु होतीस ...
उद्याच्या पिण्याचं निमित्तही तु असशील ...-
कसा विसर पडेल,
सोबत घालवलेल्या क्षणाचा...
तुझ्याविना अधुरा आहे,
कोपरा माझ्या मनाचा...-
विश्वास एवढा नाजूक नसावा...
की त्याच्यावर,
अविश्वासाचा घाव लगेच बसावा...
-