काल रात्री खूप वादळी पाऊस झाला . पूर्ण एक दिवस ना वारा थांबत होता ना पाऊस जणुकाही पाऊसाची आणि वाऱ्याची जुगलंबंदी चालू होती .त्या दिवशी कोण जिंकणार हा मोठा गहन प्रश्न होता . सकाळी नाष्टा झाला त्यानंतर जरा बाहेर नजर मारावी म्हटल नजर आंब्याचा झाडावर गेली प्रचंड मोठ झाड त्याचं प्रचंड मोठ मूळ .वाऱ्याची आणि त्या आंब्याच्या फांद्याच मोठ युद्धच चालू होत . ढाली तलवारी घेऊन सोसाट्या्चा वाऱ्याबरोबर सर्व फांद्या स्वतःच सर्व लावून लढत होत्या बघण्यासारख होत दुश्य . पूर्ण चित्रपट दाखवतात तसाच . हे युद्ध अगदी रात्र भर चालु होत .ना वाऱ्याने हात मानलेली ना झाडाने .तो खेळ तसाच चालू होता .मानवी आयुष्य ही असच असत ना सतत जगण्यासाठी रोज युद्ध करावं लागत कधी स्वतः बरोबर कधी आपल्यान बरोबर तर कधी जगा बरोबर .हेच तर जीवन असत नुसत झाडासारख उभ राहण्यात काय अर्थ आहे त्यामुळे नेहमी चार हात करत रहा आणि जर पडलात तरी परत उभ राहायला विसरू नका अगदी त्या झाडाचा पालवी सारख ....
-