संविधानाच्या आधारावरच,
देश सुरळीत चालतो आहे,
संविधानामुळेच मुक्तपणे,
तुम्ही आम्ही बोलतो आहे...
अर्थपूर्ण आणि सर्वसमावेशक,
यातील एकेक विधान आहे,
होय अभिमानाने सांगतोय,
भारतीय संविधान आहे...
याच्या रचनेमुळेचं म्हणती,
भारत हा महान आहे,
जाती, धर्म, पंथ, प्रांत,भाषा,
साऱ्यांच्या पल्याड संविधान आहे...
विश्वानेही मान्य केलंय,
लोकशाहीचा प्राण आहे,
देशाच्या उद्धाराचं गुपित,
भारतीय संविधान आहे ..-
26 NOV 2019 AT 15:07