वाट पाहणे नाही,
एकत्र फिरणे नाही,
नजरानजर नाही,
कुठली सफर नाही,
सोबत नाही, हरकत नाही,
वाद नाही, फारकतही नाही..
ओढ मात्रं तेवढी,
आपल्यात ठरते जीवघेणी..
वाटते वाजतील तुझे पैंजण,
अगदी कुठल्याही क्षणी..
तू मागे वळून पाहत नाही,
मी पाठलागही करत नाही,
तरीही उंबरा लांगून,
येतोच एखादा क्षण,
वनवास संपवून भेटतेच,
तुझेपण नी माझेपण..
- Surya
15 JUL 2019 AT 19:52