साधेपणा आपले बाह्य स्वरूप कधीच व्यक्त करू शकत नाही, मनातील भावना आणि हृदयाची वेदना वास्तवाला व्यक्त करते. मग साधेपणा रुपात कधी नसतेच, तो तर भावनांनी दळलेल्या नयनात वास्तव स्वरुपी वसलेला असते.
पैश्यानी लोक कितीही अमीर झाली मात्र "कमावलेला विश्वास आणि जमवलेली नाती" हीच माणसाची खरी संपत्ती. आजच्या काळात अशी नाती मिळत नाही// आणि ज्यांना अशी नाती मिळाली, त्यांना ती नातीच कधी कळत नाही// म्हणून विश्वास व नाती नक्की जपा.
"आपण काही चुकीचं तर नाही करत ना..!!" वारंवार हेच वाक्य कित्येकदा बोलतो, फक्त आपल्या घरच्यांना त्रास न व्हावा म्हणून...... किती सुंदर असतात ना ते भाव, ज्यात आपल्या पेक्षा घरच्यांची, आपल्या आवडत्या व्यक्तीची काळजी जास्त असते. कारण फक्त एकच, त्यांच मन न दुखाव आपल्यामुळे.....🙂