प्रेमाची भेट अमूल्य असते
अतुल्य भेट स्मरणात राहते
जपून ठेवावी हृदयात
ती नेहमीच नवी भासते
-
किती सांगावे मनुष्यास
प्रगतीच्या नावाखाली अधोगती चा आभास
डोंगर, झाडी चा करतोय नाश
प्लास्टिक चा वापर करतोय सर्रास
प्रदूषणाने कोंडलाय श्वास
स्वतःच करतोय स्वतःचा विश्वासघात
पृथ्वी दिन, पर्यावरण दिना निमित्ताने होतो
तात्पुरता जागा
परत दरवर्षी येतो पूर मग पुन्हा दोष देतो पावसाला
-
बचपन
याद आए
आज बहुत मुझे
तब नहीं था मोबाईल
बढ़ते कुदरत की गोद में
दूर थे कई बेतुकी बातों से
तुम बड़ी जल्दी बड़े हो गए हैं
हम तो ग्रेजुएशन तक मासूम ही थे-
अशा अंधारल्या क्षणी
आठवते आई
जी धीर मनाला देई
हे तर जीवन चक्र
कधी झुळूक वाऱ्याची
कधी वादळाची अरेरावी
गरज आहे संयमाची
होऊन निरभ्र आकाश
आस ठेव सूर्यदर्शनाची-
नको करुस खंत अपूर्णपणाची
जन्म देऊन स्वतःपासून दूर करणाऱ्याही आहेत
जन्म देण्याआधी जीव घेणाऱ्याही आहेत
तू हो आई अनाथांची-
हे बुद्धा! कोटी कोटी नमन तुला
तुझ्यातली शांतता भावते मनाला
कशी करावी आत्मसात?
कलियुगात अशक्य मानवाला
संदेश तुझा अहिंसेचा
कलियुगात हिंसाचार अती वाढला
त्यागभावना तुझी अमर
सोडून सुख तू जवळ केले अरण्याला
जयंती साजरी करताना तुझी
कलियुगात माणूस जमिनजुमल्यात अडकला
विचारांची तुझ्या होत आहे अवहेलना
यावे आपण पुन्हा जन्माला
कलियुगात शांतता, अहिंसेचे बीज पुन्हा रोवण्या
-
आई ग !!!!!
लागता कळ वेदनेची गहिरी
आठवते पहिले आई
ती हाक आपसूक जाई
जिथे कुठे असेल आई
अस्वस्थ ती होई
लवते पापणी, मन सैरभैर होई
बाळासाठी देवाकडे धाव घेई
मिळती संकेत अशुभ बाळास जप माते कुलदेवी
काय ही आंतरिक ओढ लेकराची आईशी
ना निरोप ना ठाऊक काही
तरीही बाळाच्या वेदनेची आईस जाणीव होई
-
Mother's day वगैरे celebrate करण
म्हणजे माझ्यासाठी फक्त काळासोबत चालणं
इतक सोपं आहे का आईच पांग फेडणं
शब्दसंग्रह पुरणार नाही गाण्या तीच गुणगान
आई आणि लेकरच नात नसत कधीच भिन्न
लेकरापुढ आईला आकाश असत ठेंगणं
प्रथम देवता ती रोज व्हावं तिच्या चरणाशी लीन
लेकरासाठी करते जी जीवच रान
एका दिवसात होता येईल का आईविषयी कृतज्ञ ?
-
राजस्वलेची मनस्थिती
काही नकोस वाटावं
शांत शांत पडाव
नाही कोणीच अवती भोवती
एकटीच, एकाकी, एकांती
आजुबाजूला सगळ सुरळीत
तरीही हीच काहीतरी हरवल्यागत
मळभ आल्यासारखं गढूळलेल आभाळ
तसंच हीच मन गोंधळलेल
जवळ बसाव, यावं सखयानी
मधूनच मन दाटतंय माहेरच्या आठवणींनी
वाटे आईच्या कुशीत शिरावं
आणि साऱ्या वेदनांनी पळाव
आकाश निरभ्र, निळशार व्हावं-