-
जो कागदातुन ऐकायला येते
अन
लोक म्हणतात मी कविता करते.❤..📝
I write to fe... read more
राहिले ना अप्रूप आता या पैश्याचे
स्थिती आज साऱ्यांची सारखीच झाली आहे...
कुठे कुठे शोधता श्वास आता
माणसाने माणुसकीचा तळ गाठला आहे....
कुठे ठेऊ आशा माणुसकीची नक्की
जिथे तिथे भावनांचा समुद्र गोठला आहे....
राहीले नाही जुने काही इथे आता
फक्त मुठीत माझ्या थोडा श्वास उरला आहे...
नावाला बदनाम झालाय कोरोना
खरा वैरी तर माणसाचा माणूस बनला आहे....
श्वास ही थांबेल का हो या गर्दीत माझा
जीवाला घोर हा साऱ्यांच्या लागला आहे..
उजेडाकडे लक्ष जाईल कसे आता
आयुष्यात फक्त अंधार साचला आहे...
शोधात आहेत सगळे प्राणवायू च्या आता
जीवाचा इथे खेळ मांडला आहे...
शोधू नको आता देव माणसात
जिकडे तिकडे आता रावण बसला आहे...-
यू तो मै हर साल हजारों रंगो में रंगती हुँ
पर तुने जो लाल रंग लगाया था
पिछली होली कि साँझ को
वो अब तक याद है-
प्रेमाच्या सखोलतेची जाणीव
फक्त अंतर करु शकतो
कारण
जवळीकता तर फक्त दुरावा वाढवते
हे अंंतर ही एक प्रेम परीक्षा असते
ज्यात यश झाले तर आनंद ही आनंदच
आणी अपयश आले तर दु:खाशिवाय
काहीच हाती लागत नाही
-
प्रतिबिंब तुझे मनात असते
मनातलं पेंटिंग तुझ्या छायाचिञात दिसते
काढवुन घेतलेले ते पोट्रेट तू समक्ष असल्याचे भासवते
ते पुन्हा-पुन्हा बघत मी तुझ्यात हरवते
हरवुन माझे देह भान तुझेच नाव उच्चारते
मनात प्रेम रुजलय म्हणुन
दिवसाच्या स्वप्नातही तुच दिसते
तुझे नाव घेता शब्दा-शब्दातुन कविता फुलते
माझ्या मनाच्या घरात फक्त मी तुलाच शोधते
स्वप्नांच्या या तारांगणात मी तुलाच बघते
तुझ्या प्रेमाची चाहुल ही या मनाला भंडावुन सोडते
कधी तु तुझ प्रेम कबुल करशील हाच प्रश्न उदभवते
हे भाव माझ्या मनाचे कवितेत दिसते.-
रंगी रंगुनी निळा रंग
मोरपंख घेऊनी सजलास तू
हातात घेऊनी ही मधुर बासरी
या राधेला वेड लावलस तू-
खुळया काळजाची मुकी ओढ तू
गारव्यातल्या गवताला दवबिंदूची जोड तू
श्रावणातल्या आभाळाला इंद्रधनुष्याची साथ तू
मनात हरवलेल्या आठवणींचा वाटतो आभास तू
पौर्णिमेच्या चंद्राचा अलोभनीय प्रकाश तू
खळखळत्या झऱ्याला पावसाची साथ तू
भिरभिरत्या फुलपाखरांना गोड फुलांची जोड तू
काळोखातल्या आभाळाला चांदण्यांचा सहवास तू
येणाऱ्या स्वप्नांतला वाटतो राजकुमार तू
लिहिलेल्या शब्दांचा अर्थ तू
नामाला दिलेला सुंदर विशेषण तू
मध्य-रात्रीच्या विचारांची दरी तू
दु:खानंतर येण्यारया सुखाची चाहूल तू
वैशाखातल्या पावसाला मंद वाऱ्याची साथ तू
धागा मी गाठ तू
स्पर्श मी आभास तू
ह्रदय मी तेज तू
आत्मा मी प्राण तू
श्वास मी अर्थ तू
प्रेम मी जीव तू
लिहिलेल्या कवितेचा आहेस विषय तू...-
का कुणास ठाऊक का वाटत आता फक्त
स्वत:च्या विश्वात रमाव
स्वत:ला सांगाव अन स्वत:शीच बोलाव
स्वत:लाच रागवाव अन स्वत:लाच समजाव
मिळेल तेव्हढा वेळ स्वत:तच असाव
हळुच मनाला प्रश्न कराव अन स्वत:च उत्तर द्याव
स्वत:शीच नुसत गुनगुनत राहाव
अन स्वत:तच गुरफटत राहाव
स्वत:च्या विचारात हरवुन
अन स्वत:च्याच प्रेमात पडाव...-