ढग जसे दाटून यावे,
तशाच भावना ही गहिवरून याव्या आणि
झिरपणाऱ्या थेबांसारखे
ओथंबलेले अश्रू ही गळून पडावे!
पाऊस जसा सर्वकाही धुवून टाकतो
तसेच विचारांनाही धुवून टाकावे!
गढूळ झालेले पाणी
जसे सहज ओतून देता येते
तसेच गढूळ मन ही
सहज स्वच्छ करता यावे!
काळे ढग सरल्यावर जसे आकाश निळेशांत होते
तसेच हे चित्तं ही शांत स्थिर व्हावे!
-