अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रंप निवडुन आले,
त्यांनी इमरान खानला सन्मानपुर्वक बोलावले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
पुस्तकांनी संपुर्ण जगावरती राज्य केले,
गुगलने आत्महत्येचा मार्ग स्वीकारले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.-
• जे सुचेल ते मनसोक्त लिहीणे,
माझ्या शब्दाने तुमच्यावर रा... read more
दरवेळी प्रमाने किम जोन बहुमतांनी निवडुन आले,
त्यामुळे अर्बंट आयंस्टायनचे रोजगार हरवले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
अमेरिका व रशिया मधले शीतयुध्द संपले,
चीनने पाकिस्तानवरती आक्रमण केले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
आम्ही दुर्बिनीतुन नासाच्या प्रयोगशाळेत पाहिले,
नासाने नविन घोडागाडी तयार केले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.-
उन्हाळ्यातही विजांसोबत पाऊस बरसतो,
अमावश्येलाही तो चंद्र आकाशात खीलतो,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
रात्रभर आम्ही त्या सुर्याकडेच पाहतो,
धावण्याच्या स्पर्धेत आम्ही प्रकाशाला हरवतो,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.
न्युटन महाशयांनी वेगेचे तीन नियम लिहीले,
आमच्या मित्राने तीनीही नियम एकदाच मोडले,
म्हटलं तर सोपेच आहे ते सगळं,
कारण हे जगच आहे आगळं-वेगळं.-
कलियुगात भावनांचे छत्रच बदलले,
प्रश्नचिन्ह व पुर्णविरामच पाहायला मिळाले,
उद्गारवाचक चिन्हानेतर निवृत्ती घेतले,
मोबाईल मुळे विरामचिन्हेच कायमचे हरवले.
-
आर्यभट्टाने अमूल्य शुन्याचा शोध लावले,
न्युटनने गुरूत्वाकर्षनाचे नियम सांगितले,
तरी सुध्दा अवकाश विज्ञान अर्धवट राहिले,
त्यामुळे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह जोडले.
सेकंदा मागे सेकंद जोरात धावले,
पहिला पोटोभा म्हणत जेवण आम्ही केले,
परंतु काम आम्ही मात्र अर्धवटच ठेवले,
आणि वाक्याच्यी शेवटी अर्धविराम आले.
ईश्वराने ह्या महामानवास विचार सुचवले,
तेच विचार ह्या लेखणीतून पुस्तकात उतरले,
पुस्तकांनी विचार अनोख्या रितीने प्रकट केले,
तेथे विचारांना अवतरण चिन्ह सापडले.-
लेखकांनी नवनविन लेख लिहीले,
वाचकांनी ते लेख वाचुन काढले,
जीवनामध्ये त्यांना बदल घडवले,
त्यास आता पुर्णविराम मिळाले.
सुर्याने पश्चिमेकडे प्रस्थान चालू ठेवले,
पहाटे कोकीळेने गायन चालू केले,
अनेक गोष्टी तेथेच हजर झाले,
त्यावेळेस स्वल्पविराम उपयोगी पडले.
लोकशाहीची अंमलबजावणी चालवले,
अनेक गोष्टी मानवापासुनच लपवले,
हजारो प्रश्न तेथे तेव्हा विचारले गेले,
तेव्हा प्रश्नचिन्हा तेथे उपस्थित झाले.-
फरक पहा,
ज्या व्यक्तीने कोविड-१९ वरती लस तयार केली त्या व्यक्तीला कोणीही फोलो करत नाहीये, परंतु ज्या नालायकाने १५ सेकंदासाठी भीक मागितले त्याला मात्र सर्व नालकांनी फोलो केले.
आणि आपली युवा पिढी देशाचे नेतृत्त्व करेल....-
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…
तहानलेल्या डोळ्यांमध्ये आनंद आण रे,
मंदिरातल्या दिव्याने सुध्दा वाट दाखव रे,
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…-
सकाळी-सकाळी गाईंचे दुध पाठव रे,
माझ्या मराठी मातीत मला खेळव रे,
सायंकाळी आईच्या कुशीत झोपव रे,
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…
लिहिण्यासाठी पाटी-पेन्सील दे रे,
सरस्वती मातेचे मला दर्शन घडव रे,
विद्येच्या महासागरात मला बुडव रे,
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…
माझ्या बाबांना खाऊ आनण्यास सांग रे,
“गल्लीतल्या दोस्तीला लपाछुपी खेळतो का ?”विचार रे
पण मला दररोज शाळेत पाठवू नको रे,
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…-
किल्ला बांधायला मला लाल माती दे रे,
त्याच किल्ल्यांमधुन इतिहास दाखव रे,
छत्रपती शिवरायांचे विचार शिकव रे,
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…
माझ्या आजीला लुकलुकत्या ताऱ्यांमध्ये दाखव रे,
अमावश्येच्या चंद्राला पुन्हा येण्यास सांग रे,
“सुर्याला रात्री कुठे लपतोस ?” विचार रे,
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…
सुरेश भटांचे कविता चालात गातो रे,
साने गुरूजींचे सुविचार दररोज वाचतो रे,
गणपती बाप्पांना सदैव नमन करतो रे,
लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…-