काही नात्यांना नाव नसतं..ना ते एका विशिष्ट साच्यात बसवता येतात.मैत्री, प्रेम ह्या मर्यादेच्या, जाणिवेच्या पल्याड ते पोहोचलेलं असतं. सतत सोबत असत नाहीत, ना रोज बोलणं होतं, ना विचारपूस, ना गमती जमती, ना रूटीन रिपोर्ट..काही काही नाही.. कधीतरी अगदी खूप दिवसांनी फक्त एक "साद" येते अन् तितक्याच ओढीने, आत्मीयतेने "प्रतिसाद"ही.. आणि बोलणं सुरू होतं. अगदी आतलं.. वाटत असलेलं, आंतरिक दाटलेल.. ना आड पडदा ना अवघडलेपण असतं.. निखळ मनमोकळा संवाद होतो आणि मनावरचं मणामणाचं ओझं अलगद उतरवल जातं, हलकं वाटतं.. तेवढा क्षण बस तेवढाच वेळ.. अन् मग जो तो ज्याच्या त्याच्या वाटेला.. आपापल्या विश्वात..पुन्हा कधी भेटू, बोलू हे जाणून न घेता प्रवास सुरू.. परत कधी बोलू माहित नसलं तरी पुन्हा हीच साद आणि हाच प्रतिसाद असणार हे नक्की माहित असतं.. किती भारी असतं हे नातं आणि असं एक नातं प्रत्येकाच्या आयुष्यात असावच असावं..
-