सौभाग्याचं लावण्य,
लेण कुंकवाच,
बंधन पवित्र काळ्या मण्यांच,
कौतुक किती ते हिरव्या बांगड्यांच,
कपाळावर तुझ्या अस्तित्वाचा साज
मिरवते मी जन्मा- जन्मांतरी,,
असावं वडाईतक दिर्घाऊष्य तुला,
ही एकच आस या अंतरी.....-
जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩 जय शंभुराजे 🚩ओम नमः शिवाय🌼🌼🌺
शब्द माझे तुझ्य... read more
फुल, मन एक फुल...
स्वतःच्याच गंधाची का
स्वतलाच भुल.....
विचारांचे गंध
गंध अस्तित्व अनोखे,
सर्वदूर पसरता,
येती कीर्तीचे कवडसे.....
कांतीचा रंग,
रंग हृदयात निर्मळ,,
वाचता न येणारे,
इथे सत्य असे गहाळ...
-
दूर दूर पर्यंत,
शोधले मी भाव तुझे,,
पण अजूनही अज्ञात मी,
सांग मला गाव तुझे,,
ना पत्ता,ना ओळख,
नाही माहित नाव तुझे,,
डोळ्यात मात्र तुझी लख्ख प्रतिमा,
शोधेल मन मग ठाव तुझे,,
जोखीम मी तर घेतलीच आहे,
आता नको विरहाचे घाव तुझे,,
काळीज आतुर धावतेय तुझ्याकडे,,
सांग ना मला गाव तुझे......-
चंद्राच्या प्रकाशित वाटेवर,,
पुन्हा सांज आज विरघळते आहे,,
पुन्हा नव्याने ओढीत कुणाच्या,
त्यात विरहाचे क्षण वितळते आहे,,
दूरवर राहिला गाव माझा,
अवखळ वाऱ्याच्या झोताने मला दर्शवते आहे,,
माझी माणसं असतील का प्रतीक्षेत माझ्या,,
डोळ्यातील पाणी तिला आज विचारते आहे....✨-
स्त्री होऊन जगताना,
अनेक जन्म घ्यावे लागते,,
कितीतरी वळणावर,
अनेक घाव तिला सोसावे लागते,,
पदरात रखरखत घेऊन ऊन,
सुखाची सावली ती होत असते,,
अंतकरणात ममत्व घेऊन,
ती मायेचं प्रतीक म्हणून मिरवत असते,,
नाही ती अबला,नाही ती दुबळी,
कणखर,आशावादी तिची ओळख असते,,
ढाल होऊन संकटांच्या तलवारिशी,
अविरत युद्ध तिचे सुरूच असते,,
भाग्य लागतं स्त्री म्हणून जन्मायला,
कारण स्त्री तर निर्मिती असते,,
तीच्याविन सारेच भिकारी आहेत,
कारण प्रत्येकाच्या माथ्याच तीच उजळ भाग्य असते....-
पाहता पाहता
जवळूनी तुजला,
भावनांनी पापण्यांचे
उंबरे ओलांडावे,,
क्षणांत अशीच तू
येता जवळी,,
ह्रदयीचे स्वर
तुझ्या श्वासात सांडावे....♥️🥀-
कासावीस मनातली
ओठावर येते,,
भावनांच्या ओघात
विरघळून जाते,
अंगावर शिरशिरी
मग दाटून येते,,
अन् ओंजळ प्रेमाची
उधळूनी जाते....✨♥️-
सब कर्म के फल इतनी आसानी से तो नहीं मिलते,,
इसिलिये तो आपसे एक बात सीखी हैं हमने.....
“इंतजार”✨⏳-
ते आईच्या कुशीतील
निरागस बालपण,
भावंडासोबतच्या खोड्या,
अन् बाबांचा काळजीवाहू धाक,,
तो शाळेत खाल्लेला मार,,
अन् आजीची मायाळू थाप,,
सारं काही मनाच्या पडद्यावर,
एखाद्या चित्रपटासारखा
प्रत्येक क्षण थिरकुन जातो.....
-
ज्यावेळी स्वतःला
हतबल वाटू लागतं,,,
त्यावेळीच तर
एकांताच पर्व सुरू होत......
मग कितीही भोवताली
कोणीही असुदया,,
एकटं होण्याची जाणीव
,न एकटच वाटतं.....-