जीवाचे दुसऱ्या जीवाशी संबंध हे बहुतांशी रुणानुबंध, व्यवहार व गरज यातूनच निर्माण होतात.वरवर ते जिव्हाळ्याचे आणी आपुलकीचे दिसले तरी कालाधीनच असतात.काही काळानंतर त्यात बदल होउन ते संपुष्टातही येत असतात.मात्र सद्गुरुशी भक्तीच्या माध्यमातून येणारे संबंध मात्र भावमधुर व कालातीत असतात त्यामुळे ते जेव्हढे दृढ आणी घट्ट होतात तेव्हढाच त्यातील गोडवा व माधुर्य हे वृध्दींगतच होत राहाते.
-