कवितेला काही बोलायचं असतं
-
तुझ्या वेदनेचा पाऊस कुणा कळेना
गारव्याला कुणी जाऊन सांगा
वीज आर्ततेची भिडेना काळजाला
त्या ढगांना कुणी जाऊन सांगा
कसा बहरला श्रावण इकडे
त्या वैशाखाला कुणी जाऊन सांगा-
आप यूं तनहा होकर
गर फूल शब्दों के इतने महकाती होगी
माफ करना कहता हूं ऐसे
आप तह जिंदगी यूंही अकेले रह जाए-
कितना कर्जा उधार लिया तूने
गमों से तन्हाइयों से
थोड़ा हसकर चुकता भी कर दो
जिंदगी है जनाब ऐसी ही है-
जो भीगा दे मन को
ऐसी बारिश हु शायद
हवाओ में फैली
भीनी भीनी खुशबू हु शायद
कही नही हू पर
आरजू, ख्वाहिश हु शायद-
सगळंच कसं बोलता येत नाही
शब्दांत बांधता बांधवत नाही
बाबा नावाच्या वटवृक्षाला
डोळ्यांत सामावता येत नाही
तू नेहमीच चुकतोस
तुला काहीच समजत नाही
बाबा झाल्यावर कळलं जरा
डोळ्यात पाणी का बरसत नाही-
एक पल लगता है
कुछ बोल पड़ेगी
कविताएं भी बदतमीज होती है
कहती तो कुछ नहीं
और बया भी कर देती हैं-
आम्ही ताठरतो कधी कधी
झुकतही नाही, वाकतही नाही
आजुबाजूच काही दिसतही नाही
मृत पावलेल्या देहासारखे
हातभर जमिनीपासून सुटतो
आणि तरंगायला लागतो
मातीतल्या जीवन रसाने फुललेलो आपण
मुळांना तोडत सुटतो
बंध सुटून आभाळाकडे झेपावतो
पण पानगळ सुरू होते
फुलांचा गंध हरवतो
आपला पुष्प गुच्छ होऊन जातो...
माती सुटली तेव्हाच खरंतर
आपण संपलेलो असतो...-
पाऊस उगाच पडत नाही...
कुणाच्या वहीत पाऊस पडतो
कुणाच्या मोबाईल मध्ये पडतो
कुणाच्या ओठांमधुन दरवळतो
कुणाच्या अंग प्रत्यंगा तून थिरकत सुटतो
सृजनाची नुसती लयलूट होते…
पाऊस उगाच येत नाही
त्याला नव्या सृष्टीच्या सृजनाची
स्वप्ने पडतात म्हणून तो येतो…-