ते लव्ह लेटर तुला द्यायच होतं.....
ते लव्ह लेटर तुला द्यायच होतं पण हिम्मत झाली नाही.
हिम्मतीची गंम्मत झाली असती आणि गमतीची भली मोठी किंमत झाली असती.
मनातल सांगून आयुष्यात आणायच होतं.
आयुष्यात आणून प्रेमाचं चांदणं करायच होतं.
पण चांदणं तर सोडा इथं
हिम्मत आणि किम्मत सुट्टीवर गेली.
लव्ह लेटर बॅग मध्येच राहील.
राहिलेलं आयुष्य बॅग कडे बघण्यातच गेलं.
तीच हसणं पाहूनच कॉलेज सोडल.
कॉलेज सगळं स्वप्ननातच राहीलं.
थोडी हिम्मत केली असती तर आजचं जगणं वेगळं असतं.
आता जुन्या कडीला ऊत कशाला म्हणून ते लव्ह लेटर स्वतः च वाचून शांत बसत असतो.
पण तरी कधी कधी वाटतं
ते लव्ह लेटर तुला द्यायच होतं.-
Lives in Maharashtra (Parbhani)
संस्थापक-चार्वाक दर्शन मंच
संचालक-अन्नदाता कृ... read more
तिचा सहवास नसताना व्याकुळ होतो मी.
तिच्या डोळ्यात पाणी पाहून व्याकुळ होतो मी.
तिच्या भेटीसाठी व्याकुळ होतो मी.
तिच्या दुराव्यामुळे व्याकुळ होतो मी.
माझ्या आयुष्यात ती नसेल तेव्हा तेव्हा
व्याकुळ होतो मी......
-
बघ माझी आठवण येते का....
वाऱ्याची झूळुक येते त्यात वाळलेलं पान जेव्हा तुझ्या गालावर येऊन चिकटत तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
प्रचंड उन्हात घामाच्या धारा तुझ्या गालावरून तरंगतात तेव्हा बघ माझी आठवण येते का.
पावसाच्या सरी कोसळतानाचा मंद आणि गोड आवाजा येतो तेव्हा बघ माझी आठवण येते का.
सायंकाळी गच्चीवर फिरताना एखादं पाखरू डोळ्यसमोर घिरट्या घालतं तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
कडाडनाऱ्या विजेचा लक्ख करणारा प्रकाश डोळे दीपवतो तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
आकाशात इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण पाहून मन प्रसन्न होतं तेव्हा
बघ माझी आठवण येते का.
शेतात काळ्या मातीवरून चालताना मातीची कणं पायाला चिकटतात तेव्हा
बघ माझी आठवण येते का.-
तुझ्या आठवणीच ओझ वाहत बसलोय.
जुन्या काळातील प्रसंग आळवत बसलोय.
नव्या प्रसंगांना परीक्षा समजत बसलोय.
जुना काळ,जुन्या व्यथा जगाला सांगत बसलोय.
जीवनाच्या क्षणांची वजाबाकी करत थकलोय.
तुझ्या आठवणीच ओझ वाहत बसलोय.-
#Dandi_March
भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता.
यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
याचे नेतृव मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी) यांनी केले.
आज रॊजच्या जेवणात मीठ ह्या जीवनावश्यक वस्तुवर कर नाही त्याचे श्रेय महात्मा गांधी यांना जाते.
रोज जेवताना त्याची आठवण ठेवली तरीही खूप झाले असं मी म्हणतो.-
रोजच्या नजरानजरेतून बोलायचं
होतं खूप काही सांगायचं होतं.....
मनातला अबोला,रुसवा,फुगवा
ओठांवर आणायचं होतं खूप काही सांगायचं होतं....
कोंडून घेतलेल्या अश्रूंचे बांध फोडायचे होते
खूप काही सांगायचं होतं....-
स्वप्नांच्या आकाशात चांदण्यांचा ऊजेड पडावा आणी तुझ्या आठवणीत चंद्राने अभिषेक करावा ईतका मोह तुझ्या भेटीचा असावा.....
-
🙏निमंत्रण पत्रिका🙏
चला चार्वाक समजून घेऊ या....
विषय-आजच्या काळात विज्ञानवादी चार्वाकाची गरज
वक्ते-नितीन सावंत सर लेखक तथा संस्थापक मानव मुक्ती मिशन
चार्वाक कोण होते ?
त्यांचे भारतीय दर्शन इतिहासात येागदान काय?
लोकायात दर्शन म्हणजे काय?
ब्रहस्पती कोण होते?
चार्वाकाचा विज्ञानवादी दृष्टीकोण...
आजचे युवा आणि चार्वाक....
भारतीय सभ्यता आणि चार्वाकदर्शन
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी
चार्वाकदर्शन विचार मंच घेऊन येत आहे.
आपल्या
"चार्वाकदर्शन विचार मंच
चिकित्सक विचारांची गौरवशाली भारतीय सभ्यता"
वेळ -11:30
वार-रविवार
ठिकाण-"संघर्ष" भवन , चार्वाक दर्शन मंच, अप्पर जिल्हा व सत्र न्यायालया समोर,
गाळा क्र १४, गंगाखेड,जि.परभणी.
*आयोजक*
टीम-चार्वाकदर्शन विचार मंच,गंगाखेड-
जागतिक कविता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
अश्रूंची फुले जाहली,
माझी कविता धन्य जाहली.
वेदनेला पाझर फुटला,
माझी कविता धन्य जाहली.
आन्यायाला वाचा फुटली,
माझी कविता धन्य जाहली.
सुखी क्षणांची बरसात झाली,
माझी कविता धन्य जाहली.
शब्द सोहळे सजवन्यात मग्न झाले,
माझी कविता धन्य जाहली.
माणुसकीच्या वाटेवर माणसाला माणुसपण भेटलं,
माझी कविता धन्य जाहली.
माझी कविता धन्य जाहली.-
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची पायभरणी करणारे दूरदर्शी नेतृत्व.
राज्याला राजकीय-सांस्कृतीक-
सामाजिक-साहित्यिक असा सुसंस्कृत वारसा देणारे महाराष्ट्राचे शिल्पकार.
महाराष्ट्र राज्याचे पाहिले मुख्यमंत्री तथा देशाचे उपपंतप्रधान, केंद्रीय संरक्षणमंत्री अशी अनेक पदे भूषवून विकसित व वैचारिक पायभरणी करणारे सुसंस्कृत नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
कृष्णकाठ व ऋणानुबंध वाचताना त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तीमत्वाचे दर्शन घडते.-