हद्द पार
रोज नवा आतंक रोज नवा दहशतवाद.
कधी थांबेल हे सगळं का होतचं राहतील अनेक पिढ्या बाद.
आपल्याचं जाती जातीत आपण भांडत राहिलो .
काल मात्र पर-मुलकियांच्या हल्ल्यात धर्मामुळे जीवांना मुकलो.
हरली माणुसकी तिथे कलियुगाने केली हद्द पार.
क्षणापूर्वी आनंदी असलेले एका कलमामुळे झाले ठार.
नवं विवाहितेच्या समोर तिचा वर रक्तबंबाळ झाला.
तुमच्या मोदींना जाऊन सांगा हे आव्हान एक दहशतवादी देऊन गेला.
कोणत्याही देवाची प्रार्थना चूक नसते कधी.
मंत्र-कलमा वाचेल कोणीही पण जगण्याची मिळायला हवी संधी.
धर्मावर युद्ध करा असं कोणी सांगत नाही.
पाठीवर वार कराल तुम्ही पण फौजेशी लढण्याची तुमची हिम्मत नाही.
येतील हजार आंतकवादी आमचं सैन्य सज्ज आहे.
आता कसा पेच फिरतोय यावर साऱ्या जगाचं लक्ष आहे.
मोडून काढू तुमचा डाव काश्मीर बळकवण्याचा .
उखाडून टाकू पाय आतंकवादाचा मग लुटू आनंद काश्मीर पर्यटनाचा.
पहेलगाम काय पुलवामा काय आता सहनशक्ती संपली.
सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे याची खात्री आता पटली.
वाया जाऊदेत वार त्यांचे अशी एकी तोडायची नाही,
साम दाम दंड भेद वापरू देत आपल्यातली एकजूट सोडायची नाही.
"भारतीय"ही ओळख आपली धर्म पंथ सारं दुय्यम,
कितीही निर्दयी झाले समोरचे तरी सोडायचा नाही संयम....-
शायद मन नहीं है ...।
जो गलतियाँ की ही नहीं कभी,
उसकी माफी माँगते माँगते थक गए हैं ।
जो भी है अब ठीक है सब,
चाहे समझो हम बदल गए हैं।
जैसे है अच्छे है खुद के लिए,
अब किसीसे कोई शिकायत नहीं हैं।
इस सफर में एक बात समझ आई,
खुदका मोल कभी भूलना नहीं हैं।
दूर चली जाऊंगी तो शायद समझ आए,
इंसान नहीं लेकिन वक्त बेहत बुरा हैं।
शिकवा नहीं है तुमसे कोई,
जो भी हैं भगवान की देन हैं।
थम गए है सिर्फ़ आत्मसम्मान के लिए,
तुमसे कोई अच्छी उम्मीद नहीं है ।
माफ कर दिया है तुमको,
क्योंकि तुझको पाने की अब कोई ख्वाहिश नहीं है।
रुक जाते एक वादे के लिए तुम्हारे,
लेकिन सुधरनेका तुम्हारा शायद मन नहीं है ।-
कॉलेजचे ते दिवस
काल एका कॉलेजच्या आवरात थांबले होते,
आसपास मैत्रीचे अनेक किस्से रंगले होते.
कुठे खोड्या कुठे दंगा कुठे अभ्यास चाललेला,
हजेरीसाठी एकचं कल्लोळ उडालेला.
जागोजागी उसळत होते हास्याचे ज्वालामुखी,
भांडणं-तंटे सुरूचं पण नव्हतं कोणी दुःखी.
प्रत्येकजण कॉलेजच्या विश्वात खुश होता,
तिथला क्षणन् क्षण मला भूतकाळात घेऊन जात होता.
किती किस्से किती गप्पा सगळं काही आठवलं,
मोजता येणार नाही ते पण मनात साठवलं.
नको वाटायचं कॉलेज तिथे असताना,
आता मात्र ओढ लागते काही कारण नसताना.
पुन्हा ते क्षण आता येणं शक्य नाही,
मित्रमैत्रिणींना भेटण्याचा योग रोज नाही.
तिथल्या चुका आणि शिकवण आता कोणी देत नाही,
कितीही मोठ्ठे झालो तरी कॉलेजचे ते दिवस पुन्हा आणू शकत नाही...
-
सुखं-दुःख-आनंद-त्रास- यातना,
चक्रासारखं चालतं.
माणुसकी कोणी बघेना,
पैशाने सगळ्यांचं मोल ठरतं.
कधी दग दग कधी ट्रॅफिक,
प्रत्येक शरीर थकतं.
दिवस रात्र फरक नाही,
स्क्रीनवर काम चालतं.
आठवडाभर काम करून,
शनिवार रविवार येतो.
पुन्हा काम करायचं म्हणून,
जीवन दोन दिवसात जगून घेतो.
किती खुश दिसला समोरचा,
तरी त्याच्या मनाचा कोणाला ठाव नाही.
व्यक्त करायच्या आहेत भावना,
पण वेदनांना गाव नाही...-
चालत राहतील पाऊले,
होतं राहील काम.
मिळत राहतील मोबदले,
न करता आराम.
शिक्षणामागे चालता चालता,
जबाबदारी वाढली.
थट्टा-मस्करी-मैत्री अशी सुखं,
कॉलेजमध्येचं राहिली.
कपाटाच्या शोकेसमध्ये विरली,
एखादी आवड निवड.
छंद जोपासायला
कुठून काढायची यातून सवड.
रोज एक नवीन धडा,
अनुभव मोठ्ठी शाळा.
यातलं काही शिकवत नव्हता,
शाळेतला तो फळा.
चला उठा जागे व्हा ,
शांत बसून भागायचं नाही.
एक गोष्ट आज उमगली,
काहीही कमवा पावलांना अंत नाही.-
ओंजळ
पावसात खेळताना हात जुळवले तर त्यात पाणी साठलं,
जुळलेले हात बाजूला केले निघून गेलं.
छोट्याश्या कृतीतून ओंजळीच काम जाणवलं,
सहजतेत लपलेलं रहस्य उमगलं.
वाढत्या वयानुसार ओंजळीने कामं वेगवेगळी केली,
कधी मातीत खेळताना तर कधी काम करताना तिनेचं साथ दिली.
कोणतीही गोष्ट फार काळ नसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ती,
सुख असो वा दुःख हा ही काळ सरेल हे समजावणारी ती.
ओंजळ आपल्याला फार काही शिकवते,
किती द्यायचं किती घ्यायचं याचं मापही तिचं ठरवते.
घेताना ओंजळ भरली की बास म्हणा नाहीतर ती सांडून जाते,
देताना हेही लक्षात असुद्या की ओंजळ पुन्हा पुन्हा भरता येते...-
मरहम
पत्थरसा बन जाना शौक नहीं था मेरा,
आँखें नम करना स्वभाव नहीं हैं मेरा।
बस जो बन गए है तुम्हारे लिए ही हैं,
तुम मानो या ना मानो ये बदलाव तुम्हारी ही देन हैं।
ना कभी हम खामोशी के शौकीन थे,
बन गए वैसे तुम जैसे चाहते थे ।
तुम्हारी हर ख्वाहिश पूरी करते करते ढलते गए हम,
पर बन ना पाए तुम मेरे जख्म का मरहम ।-
मैफिलीत कवितेच्या तुझी आठवण नाही असं झालं नाही,
आठवत राहिलो तुला बाकी काही केलं नाही.
ऐकले वाचले शेर किती तरी दिसतेस प्रत्येक ओळीत,
आवाज देताचं कोणी लपतेस वहीत.
उपमेत सगळ्या शोधतो तुझी अदा,
रोज ठरवतो सावरायचे पुन्हा तुझी खळी करते फिदा.
कविता काय शेर काय गझल तू माझी,
लिहितो तुला तुझ्यासाठी वही अपुरी माझी.
अंदाज तुझ्या सौंदर्याचा लागेना तुला वाचताना,
तुझ्या रूपाशिवाय मला कविता ही सुचेना.
तुला स्पर्श करण्याचा हक्क मला नसेल,
पण तुझ्या खऱ्या रूपाची छवी माझ्या कवनात दिसेल.
आज पुन्हा आहे मैफिल माझी,
आनंद यातचं भोगतो काव्यात तरी होशील माझी...-
शिवनेरीवर पुत्र जन्मला जिजाऊंचा,
घेऊन आला सोबत किरण स्वराज्याच्या आशेचा.
रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतली,
विश्वास इतका दांडगा की शंका नाही वाटली.
मुठभर असले तरी चातुर्याचं बळ होतं,
निष्ठेवर राज्य टिकून होतं.
राजनीती नीतीने करून आदर्श त्यांनी मांडला,
महाराज्यांच्या कष्टाने आणि मावळ्यांच्या रक्ताने भगवा फडकला.
दिल्लीच्या तख्तालाही दख्खन आव्हान देत होतं,
माझ्या राजाच्या राज्यात प्रत्येकजण समानतेने जगत होतं.
दूरदृष्टी किती थोर पाहा आरमार उभारलं,
स्वधर्म पाळला पण परधर्माला सहिष्णूतेने जपलं.
उघडून मनाची कवाडं,
जाणत्या राजाला मुजरा करू मानानं.
बाळगू शिवबा हृदयी मानू परस्त्री मातेसमान,
राहुदे मोठ्ठी वचनं मनात सत्याची बांधू कमान.
नुसती चंद्रकोर कपाळी लाऊन भागायचं नाही,
मनात कपट ठेऊन राजांसारखं जगता यायचं नाही.
शिवरायांचा दरारा आदब भिनभिनुदे अंगात,
राजांचे विचार सळसळुदे रक्तात.
छत्रपती तुम्ही आमचे राजे आमच्या मनाचे,
पराक्रम गाथा जपतो तुमची फेडतो ऋण स्वराज्याचे...-
शिवनेरीवर पुत्र जन्मला जिजाऊंचा,
घेऊन आला सोबत किरण स्वराज्याच्या आशेचा.
रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतली,
विश्वास इतका दांडगा की शंका नाही वाटली.
मुठभर असले तरी चातुर्याचं बळ होतं,
निष्ठेवर राज्य टिकून होतं.
राजनीती नीतीने करून आदर्श त्यांनी मांडला,
महाराज्यांच्या कष्टाने आणि मावळ्यांच्या रक्ताने भगवा फडकला.
दिल्लीच्या तख्तालाही दख्खन आव्हान देत होतं,
माझ्या राजाच्या राज्यात प्रत्येकजण समानतेने जगत होतं.
दूरदृष्टी किती थोर पाहा आरमार उभारलं,
स्वधर्म पाळला पण परधर्माला सहिष्णूतेने जपलं.
उघडून मनाची कवाडं,
जाणत्या राजाला मुजरा करू मानानं.
बाळगू शिवबा हृदयी मानू परस्त्री मातेसमान,
राहुदे मोठ्ठी वचनं मनात सत्याची बांधू कमान.
नुसती चंद्रकोर कपाळी लाऊन भागायचं नाही,
मनात कपट ठेऊन राजांसारखं जगता यायचं नाही.
शिवरायांचा दरारा आदब भिनभिनुदे अंगात,
राजांचे विचार सळसळुदे रक्तात.
छत्रपती तुम्ही आमचे राजे आमच्या मनाचे,
पराक्रम गाथा जपतो तुमची फेडतो ऋण स्वराज्याचे...
-