मैं लिखता हूं वह लिखवाता है,
कभी साथ उसके कभी,
खिलाफ चला जाता हूं,
शिद्दत-ए-इश्क मेरा लफ्जों से है,
कभी इबादत तो कभी,
बगावत पर उतर आता हूं |-
JUST TRYING TO EXPRESS..........
हजारो भेटतील माझ्यासारखे
पण त्या हजारांमध्ये मी नसेल,
जरी जुळले तुझे गुण छत्तीस
तुझ्या कुंडलीमध्ये,शनि बनून मी बसेल.
-
एरवी पाहताच मला काठ्या शोधणारे
आज माझ्याकडे दूध घेऊन येतील,
या दोन पायावर चालणाऱ्यांचा काही नेम नाही देवा
रंग बदलण्यात हे सरड्यालाही मागे टाकतील.
-
लोकसंख्येचा भस्मासुर नाते गिळून टाकणार,
आम्ही दोन आमचे दोन,नात्यांना मर्यादा आणणार,
सख्या भावांना बहिण,बहिणींना भाऊ नाही मिळणार,
दुखद पण पुढच्या पिढीला,काका मावशी नाही ऊरणार.
येणारी पिढी शेवटची,जी एकत्र कुटुंब पाहणार,
कधी काका कधी मावशीच्या, मांडीवर खेळणार,
"माय मरो मावशी जगो" या म्हणीचा काळ संपणार,
आई-वडिलांना वृद्धाश्रमाची संस्कृती कळणार.
कुटुंब होणार चौघांचे चार भिंतीत रमणार,
चुलत, मावस नाते,हे नामशेष ठरणार,
अतिरेक होऊनी लोकांचा,जमीन अपुरी पडणार,
नशीब,ती दशा पाहायला आम्ही इथे नसणार.
नशीब,ती दशा पाहायला आम्ही इथे नसणार.
-
पहिलं प्रेम म्हणता,आजही ती आठवते,
बाकावरून समोरच्या,चुकवत नजर ती भिडते,
पाहता क्षणी मनात, विचित्र विलक्षण घडते,
हरवूनी स्वतःला, ती नव्याने मज सापडते.-
पहिलं प्रेम म्हणता,आजही ती आठवते,
बाकावरून समोरच्या चुकवत नजर ती भिडते,
पाहता क्षणी मनात, विचित्र विलक्षण घडते,
हरवूनी स्वतःला, ती नव्याने मज सापडते.
बोललो न मी तिला ती मला न बोलली,
संमती मनातली नजरेने अलगत हेरली,
स्पर्शही न करता तिला नसानसात भिनली,
निखळ,निरागस प्रेमाची भावना नवी मज उमगली.
इयत्तेत पुढच्या मी,पहिल्या दिवशी उपस्थित,
भेटीची वेळ तिच्या,केली होती मी निश्चित,
कावरे बावरे मन,हृदयात प्रेमाचे संगीत,
पुन्हा कधीच ती दिसली नाही, हेच प्रेमाचे प्रायश्चित.
पहिलं प्रेम म्हणता,आजही ती आठवते,
बाकावरून समोरच्या चुकवत नजर ती भिडते.
-
वह सुन लेगा तुम्हारी,पर उसे बार-बार
दोहराकर अमलं करने का वक्त ना देना,क्या सही है,
और मरने के बाद जन्नत लेकर करोगें क्या जनाब,
क्योंकि फिर से पैदा होकर तुम्हें,आना तो यही है |
-
जज्बांत जो कुचले गए,
मजबूर बने हालातों से,
सपनें छन से टूट गए,
रूबरू होकर हकीक़त से,
फिर दिल में ईक आंस जगी,
अपनी सोई तक़दीर से,
लफ्जों में छीपकर बयां हुए,
अफसानें अपने जीवन के |
-
प्रत्येकाची वेळ येते,
कुणाची लवकर कुणाची वेळ घेते,
उतावळेपणाने निराशा घडते,
संयमाने पुन्हा आशा उमलते.
प्रत्येकाची वेळ येते,
कधी दशा कधी दिशा दर्शविते,
दशा झाल्यावर लाज ओढावते,
दिशा मिळाल्यावर माज चढवते.
प्रत्येकाची वेळ येते,
येताच ती जाण्याकडे वळते,
चांगली,वाईट जाताना ठरते,
गेल्यावरही अनुभव रुपी उरते.
-
जिनकी मंजिल ही सफर होता है,उन्हें कहीं से निकलने की और कहीं पर पहुंचने की कोई जल्दी नहीं होती |
-