तुझ्या केसांचा आंबाडा वगळून
रुळते एक बट जी गालावर
निळ्याशार डोळ्यासवे करते
अलगद वार ती काळजावर
पुनव नक्षत्रांचा तू साज माळलेला
चंद्र जणू हासरा नाकातल्या नथीवर
मनमोहक सखे तुझ्या साऱ्या अदा जरी
स्वभावाची भुरळ कोरलेली मनावर
भासतेस चाफ्याचा मनमोहक दरवळ
तू शहारणारी पावसाची पहिली सर
आनंदाने जपावी तुझी सोबत जन्मभर तू
अस्वस्थ काळजावर एक प्रेमळ फुंकर-
बाहेरची माणसं कितीही कमवा
पण त्यांच्या गर्दीत आपली हक्काची
माणसं पण जपता यायला हवीत.-
अ अज्ञानाचा ते ज्ञानाचा ज्ञ मराठी
ज्ञानेश्वरांची ओवी मराठी
शिवरायांची बोली मराठी
कुसुमाग्रजांची कविता मराठी
महाराष्ट्राची अस्मिता मराठी
जपतो प्रत्येक जण काळजात मराठी
आता आमची अभिजात मराठी.-
दर्द कोई भी हो जिसमे दवा का काम नही
तब यारों के मैफिल जैसा सुकून या आराम नही
सजती है मैफील चार सच्चे यारोंकी जिस दिन
यकीन कीजिए ऐसे मैफिल से नशीला जाम नही-
कशाला फक्त जिंकण्याचा अट्टाहास हवा
मला त्यासोबतच मोकळा श्वास हवा
लगाम लावून घोडा सुद्धा शर्यत जिंकतो
पण मनसोक्त जगण्याचाही ध्यास हवा-
हा,मौन हु क्यों की खुद को तराश रहा हु अभी
और लोग पूछ रहे है "तू इतना क्यों बदल गया?"
"तालीम इन हालातोंने कुछ ऐसी करा ली है जनाब,
के अब जिंदगी को देखने का नजरिया बदल गया।"-
जबाबदारी घेणं आणि जबाबदारी येणं
या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत
जबाबदारी घेणारा ती निभावण्यासाठी परिपक्व असतो
या उलट ज्याच्यावर जबाबदारी समोरून येते
त्याला कशीबशी का होईना ती निभवावीच लागते.-
जेव्हा मनात नसतानाही
आपलं गाव सोडून नोकरी धंद्या निमित्त
शहरात निघावं लागत
तेव्हा जो कंठ दाटून येतो ना,
तो आवंढा कोणालाही कळू न देता
ज्याला पचवता येतो
तो खरा जबाबदार झालेला असतो-
पैश्याचा असो कि दोन आपुलकीच्या शब्दांचा
गरज कधी कधी फक्त आधाराची भासते
कारण जगणं सगळ्यांचच वेगळं असत
इथे 'सुखाची उसनवारी किंवा दुःखाची भागीदारी नसते'-
सगळीच नाती बुद्धिमत्तेने टिकवता येत नाहीत
त्यात दोन्ही व्यक्तींचं पूर्णपणे समर्पण महत्वाचं असत
नात्याला कधीही तराजूत तोलण्याचा प्रयत्न करू नये
नाहीतर अश्या नात्यांचा कालांतराने व्यवहार होतो.-