मानलेल्या आपल्यांची काळजी करणं
त्यांच्या दुःखात साथ देणं
त्यांचं जगणं सुखकर करणं
धन नाही तर धैर्य देणं...
पुढे जाण्यास प्रोत्साहन देणं
अडथळा नाही तर आधार होणं
त्यांच्या स्वप्नांना आपलं मानणं
या जगात जागा निर्मिण्यासाठी
फुल नाही तर..
फुलाची पाकळी होणं...
✨ღ-✍ღ✨-
मला ना..
साधं राहणं आवडतं
कोणासाठी तरी असणं आवडतं...
कोणासाठी असणं
कोणाला तरी हसवणं
नात्याला जपणं
कोणाला तरी आपलं मानणं...
✨ღ-✍ღ✨-
मैं वो झंकार नही
जो महफिल की शोभा बढाऊँ
कोई लिखी गजल और शायर का शेर नही,
जो वाहवाही में सिमट जाऊँ,
मैं तो खुशबू हूँ कविताओं का,
जो हृदय को छू,
बहती हवाओं में बिखरता जाऊँ।
✨ღ-✍ღ✨-
चांद निकलने, ना निकलने का
अब कोई ग़म नहीं,
आपका तस्सवुर में आ जाना
किसी चांद से कम नहीं !
✨ღ-✍ღ✨-
मनाला ह्या कटू सत्याची जाणीव वेळेत करून देण्याच्या कर्तव्यात आपण चुकलो की त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते...
शेवटी काय प्राक्तन नावाची गोष्टच
आयुष्य घडवत असते तेच खरं...
✨ღ-✍ღ✨-
माणसांचे बदलत जाणारे रंग बघून एका गोष्टीवरचा विश्वास अजून ठाम होत जातो ती म्हणजे
"ह्या जगात कायमस्वरूपी असं काहीच नसतं"
तरीही माणूस "शाश्वती" नावाच्या अशाश्वत गोष्टीच्या मागे आयुष्यभर पळत असतो हे विशेष.
✨ღ-✍ღ✨-
पण "मोहांच्या" मोहात
जर ह्या जन्मी ही वाट टाळली
तर ह्या नांगराचे ओझे अधिकाधिक
वाढत जाणार हे निश्चित असतं.....
✨ღ-✍ღ✨-
ती वेळ, तो क्षण कधी अधोरेखित होईल
हे आपल्याला माहिती नसते
आणि म्हणूनच ह्या मार्गाचा
पांथस्थ होण्यासाठी
मन सहसा तयार होत नाही....
✨ღ-✍ღ✨-
कर्माचा नांगर घेऊन हा खडतर जीवन प्रवास आपण करत रहातो. हा नांगर, हे ओझं तेव्हाच पाठीवरून
उतरतं जेव्हा आत्मशोधाचा,
त्या परमात्म प्राप्तीचा मार्ग मिळतो....
✨ღ-✍ღ✨-
तुमच्याही पहाण्यात असे असेलच
किंवा ह्या दोहोंमध्ये एक तुम्हीही असाल.
पण खरचं एखादा करतो म्हणून त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवावी ह्याची सीमारेषा आखणं खूप गरजेचं कारण कुणी बोललं नाही तरी त्याचं गुदमरणं लक्षात घेऊन त्यांनाही मोकळा श्वास घेऊ देणं गरजेचंच....
✨ღ-✍ღ✨-