कुठेतरी वाचलेलं...
सुखाला भाषा असते, दु:ख मात्र मुकं असतं...
मला असं वाटतं,
एक माणूस म्हणून कुणाच्या तरी दु:खाची आपल्याला वाचा होता यावं...
हाच तर माणूस म्हणून जगण्यातला खरा आनंद आहे...
#जगणं... 🌼
-
Writer...
Speaker..
ओळखीचे चेहरे एक दिवस अनोळखी होऊन....
सारखंच दु:खाचा सहवास अनुभवायला देत असतात-
निसर्गाच्या कुशीत जन्मलेली कुठलीच गोष्ट कुरुप नसते..
कारण स्वतः निसर्गाचं त्यात प्रतिबिंब असतं...
मग या विशाल अशा निसर्गात जन्म घेणारा मानवी देह तरी सौंदर्यहिन कसा असू शकतो??
निसर्गात सौंदर्य म्हणजे ठराविक मापात न मोजता येणार आहे..
मग मानव कुठल्या मापात इतर मानवी देहांच सौंदर्य मोजत असेल?? याच मला नेहमी अप्रूप वाटतं..
कोण कुरुप, कोण सुंदर?हा प्रश्न त्यालाच पडू शकतो जो अजूनही निसर्गा बाबतीत अज्ञानात जगतोय...
नाहीतर या विश्वात जन्म घेणारी प्रत्येक गोष्ट सौंदर्यपूर्ण आणि परिपूर्णतेकडे प्रवास करणारी असते...-
अधांतरीच झुरणं कसं हे आता मांडावं?
कुठल्या शब्दांत सांग मी तुला समजवावं
सख्या काय करावं तुझ्यासाठी मला काही कळत नाही
तुझ्या विना माझे आयुष्य, मला साहवत नाही
आठवणी टोचतात पुन्हा नव्याने
सांग सुटतील केव्हा हे उखाणे?
भावनांचा झाला पसारा, सांग कसा आवरु मी ?
हे विस्कटलेलं कोडं, स्वतःला कसं सावरू मी?
या वेड्या मनाला कसं सांगू...
हरवलेला आनंद कुणा मागू?
तुच सांग आता...
परिस्थितीला या सामोरे कशी जाऊ ?
दु:खात या आनंदाचे गीत कसे गाऊ ?
-
आठवांचा पसारा
कधी संपतच नाही
तुझ्या वाचून मन हे
कुठे रमतच नाही...
बोलायच असतय तुझ्याशी
तुझ्या-माझ्या आपल्या विषयांवर
पण शब्द नेमके सुचतच नाही...
प्रेमाने प्रेमाशी केलेला संवाद...
शब्दांविणा होत असतो का?
एवढा साधा प्रश्न पण
उत्तर कधी मिळतच नाही...
होय!
खूप प्रेम आहे तुझ्यावर...
एवढं सांगायला ही
ओठ कधी हलतच नाही..
हिंमत कधी होतच नाही...
तुला पाहिल की
आपसूकच आनंद होतो
साध्या स्पर्शानेही तेव्हा
शहारा आल्यावाचून रहात नाही...
तुझा माझा संवाद...
अगदीच थोडका...
तरीही...
ओढ लागल्या वाचून रहात नाही...
तुझ्या माझ्या नात्याची
वीन खूप घट्ट आहे
तासनतास संवाद असावाच..
हा फक्त त्यांचा हट्ट आहे...
-
अर्ध्यात संवाद तुटले
होत्याचेही नव्हते झाले
कारणे न कळताच सर्व संपले...
हे सारं काही..
तुझ्या मनासारखं झालं ना?
तुझे मन एकीकडे पण
रमत दुसरीकडेच होते
हातावर रंग सोडून
फुलपाखरू उडून गेले
सांग.. आता तरी
तुझ्या मनासारखं झालं ना?
सर्व संपवून संबंध
रस्ते वेगळे झाले
कारणे जाणून घ्यायला ही
नाते नाही उराले
हेच हवे होते ना..
सांग.. तुझ्या मनासारखं झालं ना?
गोंधळ मनाचा समजून घे
पुढचं पाउल टाकण्या आधी
एकदा सिंहावलोकन करून घे
भविष्याचे स्वप्न पहाण्या आधी
एकदा स्वतः ला जाणून घे
आणि नेहमी आनंदी रहा..
कारण शेवटी जे झालं ते..
तुझ्या मनासारखंच झालं ना....
-
हातावर रंग सोडून फुलपाखरू
क्षणार्धात नजरेआड व्हावे...
असच तूझ अगणित आठवणी
देऊन नजरेआड होणं...
छळतय मला...
-
नातं कुठवर जपावं ?
नातं कुठवर जपावं ?
तर.... नात्यात दोन्ही बाजूने जिवंतपणा असेल तोवर...
कारण, नात्यातल्या जिवंतपणामुळेच नात्यात आपलेपणा टिकून असतो. गमती जमती टिकून आहे.
आपण जेव्हा मनाशी ठरवतो की, एखाद्या व्यक्तीशी असलेलं नातं आपल्याला शेवटपर्यंत जपायचं आहे. कितीही प्रलय आले तरी शेवटपर्यंत पैलतिरापर्यंत न्यायचं आहे. तेव्हा नात्यातला चुकांच ओझं कमी भासतं. किंबहुना समोरच्या व्यक्तीच्या चुका लहान आणि आपल्या स्वतः च्या चुका मोठ्या भासतात. आणि वेळोवेळी आपण ते सुधारण्याचा प्रयत्न देखील करतोच.
आणि हे सगळं ज्या नात्यात घडतं ते नातं जगातलं सर्वात सुंदर आणि चिरकाल टिकणारं, शेवटपर्यंत साथ देणारं नातं तयार होतं.
नात्याची वीण अधिकच घट्ट होत जाते. आणि तिच आपल्या जगण्याची संजीवनी देखील बनते.
म्हणून नातं, नात्यात जिवंतपणा असे पर्यंत जपलं की त्या नात्यात आपलेपणा शेवटापर्यंत जिवंत असतो..!-
Becoz FOCUS & DETERMINATION
are two things leads
YOU towards SUCCESS-
चाय और समोसे का साथ कभी ना तुटे
हमारे हाथों से कलम कभी ना छुटे..-