नको ना रे जाऊ सख्या, असा अर्ध्यावर सोडून
मी वेल तुझ्यासवे वाढलेली, जाईल कोलमडून
तुझ्या सावलीत वाढले, तुझ्या सोबतीत जगले
मी नाव कागदाची नाजूक, जाईल अश्रूंत बुडून....
तुझ्या असण्याने रंगवले होते रे, मी माझे मीपण
तुझ्या सोबती पाहिले स्वप्नं, अन स्वप्नवेडे जीवन
जसं तू सोडतोय मला, अस कोणी सोडत नाही रे
जीवघेण्या पावसात वेड्या, पक्षीही उडत नाही रे ....
चालता चालता का तुझे शब्द, शांततेत विरून गेले
ह्या वणव्याने सख्या, बघ प्रेमाचे पाखरु मरून गेले
जन्मापासून आत्तापर्यंत वाट बघितल्यावर भेटला तू
प्रेमा माझ्या, त्या प्रतिक्षेची शपथ तुला, तू नको जाऊ
मी जगेल तुझ्याशिवाय ही पण ते जगणे असणार नाही रे
एकदा गळालेलं पान, पुन्हा कोणत्याच देठावर बसणार नाही रे
समुद्रही रडतो किनाऱ्यावर, आपल्या मध्यात बुडणारी नाव पाहून
सांग का असं वागतोय, सांग नक्की काय करायचं गेलंय राहून
तुझे जाणे म्हणजे माश्याला जगायला सांगणे पाण्याशिवाय
दुसरा काहीच पर्याय नाही का रे, मला सोडून जाण्याशिवाय
कृष्णमेघ पसरले सारे, एवढे ढग ही कधी काळवंडत नाही रे
जीवघेण्या पावसात वेड्या, पक्षीही घर सोडून उडत नाही रे
कृष्णलेख
-