5 MAY 2018 AT 15:36

मनामध्ये अपेक्षा खूप असतात,काही पूर्ण होतात तर कित्येक अपूर्णच राहतात, ओझं हे अपेक्षेचे घेवून माणूस पूर्ण आयुष्य काढत असतो, ह्या अपेक्षाच्या ओझ्यात त्याच्या स्वतःच्याही स्वतःकडून खूप अपेक्षा असतात, त्याही कधीच पूर्ण न होणाऱ्या.
दुसऱ्यांच्या अपेक्षेसाठी माणसाला खूप काही सहन करावे लागते आणि ते ही तोंडतून काही शब्द न काढता.
जन्म हा माणसाचा अनपेक्षित,म्हणून की काय अपेक्षेचे ओझे डोक्यावर ठेवून माणूस जन्माला येतो असे वाटते.

- प्रशांत सदाशिव कोरडे