जगण्यात ह्या असावे ...ऋणदार ना कुणाचा टिकला कधी भ्रमाने..... संसार ना कुणाचा प्रश्नांत रोज असतो....सुटलो अजून कोठे झालाय आजवर हा...अंधार ना कुणाचा आहेत तेच त्यांची .....ती माणसे जिवाची मज सोडले जगाने....मी यार ना कुणाचा दिसतात ओळखीचे.... मंचावरी कितीदा गरिबांस बघ मिळाला...सत्कार ना कुणाचा विद्रोह मांडले शत.......शब्दांत भावनांचा धाकात सोसलेला.......मी वार ना कुणाचा
आसवांच्या पल्याडचं आयुष्य दाखवावंस वाटत नेहमी मला पण आसवे हि संपत नाहीत ना आसवांचा निःपक्ष धर्म समुद्र नाही या आसवांना ना कुठला स्थिर किनारा हा नेहमी आपल्याच प्रवाहात वाहत असतो स्वतःहून एकटाच साथ तर हवी असते याला पण ह्या दुःखाच्या लहरी आसवांना तळाशी अथांग भिजवून ठेवतात
तू नेहमी मला चौकटीच्या आत आयुष्य रगडताना पाहिलंस पण चौकटीतल्या दरवाज्यात उभी राहून ह्या बाह्यरूपी जगाला पाहून मधल्या मधल्या जळताना कधी तू पाहिलं नसशील मला किती स्वप्न तोडून जगतेय मी हो अर्थातच तसंच करतेय मी ह्या स्वप्नांनी खुपदा हिणवलं आहे मला प्रत्येक पावलापावलांवर ज्याची खूप मोठी किंमत मला नात्यांना ह्या बंद मुठीत करताना वेळोवेळी मिळत गेलेली आहे