साथ एकांताची चंद्राला
आस चांदण्यांची मनाला..
साद स्वप्नांची पावलांना
भास वास्तवाचे जगण्याला..-
अलगद अडकत गेलो बंधनात
गुलाबाचा मोह आवरता आला नाही.
कैकदा टोचले काटे देहाला
अंतराला काही सावरता आलं नाही..-
भावनांच्या गर्दीत हरवलेल्या मनाला
आपुलकीच्या नात्यांचा आधार पाहिजे..
जगण्याला निरागस आनंद देणारे
मोजके क्षण थोडे उधार पाहिजे..-
आयुष्याने जे काही दिलंय
सारं जपायचं आहे मला..
माझ्या वाट्याला असणाऱ्या गोष्टींपासून
आयुष्याने वंचित ठेवलंय कित्येकांना..
-
बेभान वाऱ्यासारखं आयुष्य, वेळेनुसार पळत आहे..
भरकटलेलं पाऊलं माझं, वाटेकडे वळत आहे..
माझ्या व्यथा माझ्या कथा, आयुष्य कळत आहे..
मरणाचेही किती सोहळे, सरणावर जळत आहे..-
सुचत नाही पटकन हल्ली
शब्द झाले महाग..
ओस पडत चालली माझ्या
फुलणाऱ्या शब्दांची बाग..-
व्यक्त व्हायला म्हणे मोकळा कोपरा नाही मिळाला तिला,
गुदमरून अंत झाला तिच्यातल्या 'ती' चा..-
'जर'आणि 'तर' या दोन्हींचा विचार करायलाच हवा.
गोष्ट कोणतीही असुदे,
एका नाण्याच्या दोन बाजू कळायलाच हव्या.-
कळीचं फुल होताना
तिलाही त्रास होतो..
उगाचंच नाही, फुलातून
अत्तराचा सुवास येतो..-
साध्या तिच्या असण्यावर, तो भाळला होता
त्याने दिलेला गजरा, तिने केसात माळला होता..
नजरेतून बोलायची ती, मौन तिने पाळला होता
अंतराने अंतरातून तिने, त्याला न्याहाळला होता..
नाही शब्द असा त्याचा, जो तिने टाळला होता
सरली वर्षामागून वर्षे, गुलाब वहीत वाळला होता..
भार पापण्यांचा डोळ्यांना, कडांनी अश्रु गाळला होता
विरहाच्या अग्नीत नशिबाने एका हृदयाला जाळला होता..-