माझ्या लेखणीतून ✍️
कसं आणि काय करावं ?
जेव्हा हताश वाटतं तेव्हा
आनंदाचे क्षण आठवावे ,
जेव्हा ऋणी वाटतं तेव्हा
केलेल्या मदतीचे हात पहावे,
जेव्हा बंदिस्त वाटतं तेव्हा
आभाळातले क्षण जगावे,
जेव्हा सगळं अंधुक वाटतं तेव्हा
भविष्य मनात रंगवावे,
जेव्हा भयावह वाटतं तेव्हा
प्रभूच्या चरणी लीन व्हावे,
जेव्हा एकट वाटतं तेव्हा
सोबतीचे मधुर गंध स्मरावे!
- मृणाली कालबुत गद्रे
-