जगात निरपेक्ष असं वास्तवात काहीच नाही,निरपेक्षाची अपेक्षा करणं हे देखील तेवढंच चुकीचं!
-
माझा शेतकरी राजा
लय राबतो शेतात
त्याच्या घामाच्या थेंबाची
रोटी आपल्या पोटात
तो उन्हात पेटतो
आम्ही शिजवतो रांधा
तरी त्याच्या जगण्याचा
साऱ्या दुनियेत वांदा
राजा नका म्हणू त्याले
त्याले बाप म्हणा तुम्ही
सारे रिकामे बसले
चालू त्याचा कामधंदा
तरी त्याच्या जगण्याचा
साऱ्या दुनियेत वांदा
कसा जनम भोगतो
त्याची त्यालेच खबर
खातो त्याच्याच भरोसे
अन त्यालेच खापर
त्याचा कापूस अन तूर
त्याचा गहू अन कांदा
तरी त्याच्या जगण्याचा
साऱ्या दुनियेत वांदा
भाव कष्टाचा भेटू दे
मोल घामाचं कळू दे
सोनं नाणं नको त्याले
थोडी हिम्मत येऊ दे
आता सुकवावा किती
त्याचा काडीवणी बांधा
भेटो थोडं सुख त्याले
सुटो जगण्याचा वांदा-
शब्द माझे गीत व्हावे
लेखणीच्या साथीने ।
व्यक्त होण्या धीर दिला
माझ्या मराठी मातीने ।-
"तू पुस्तकाला स्पर्श केलास अन आमच्या जीवाचं सोनं झालं" .
क्रांतीज्योतीस कोटी कोटी प्रणाम!-
चांगुलपणाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडूनच का ठेवावी? कधीतरी आपल्या मनातही डोकावून पाहावं ! कधीतरी आरश्यापुढे स्वतःलाही उभं करावं आणि विचारावेत गहन प्रश्न....मात्र उत्तरं स्वतःच्या नजरेला नजर भिडवूनच यायला हवी, नाहीतर कुणाच्या मनात उतरण्याऐवजी मनातून उतरून जाऊ आणि आपल्या मनाला त्याचा पत्ताही लागणार नाही !
-
शब्द जागती ओठांमधले
रात्र जरी ही संपून जाते
आठवणींची गर्दी होता
तुला विसरणे विसरून जाते-
कधी जाहली उषा निशेची
कधी वाटते सांज कोवळी
पक्षी होऊन विहंग करते
कधी दाटते आकाश निळाई
या वाटेतून त्या वाटेवर
चाल चालते मिरवीत ठेके
लपून बसते कधी भीतीने
कधी उंच आभाळी झोके
कधी होऊनि यक्षप्रश्न ते
छळत सुटते दाही दिशा
कधी सापडे उत्तर सोपे
आनंदाचा पिकवी हशा
आयुष्याच्या त्या वळणावर
हलके हलके गाई गीत
अल्लड मन हे गुपित मोठे
चालवते जगाची रीत
-
बाबा हे बाबा च असतात, प्रत्येक फोटोशूटमध्ये ते सामील होत नसतात, कारण त्यांची भूमिका पडद्यामागची असते.
-