अठरा तास अभ्यास करून
जनक ठरले संविधानाचे
दीन-दलितांसाठी आयुष्य खर्चिले
बाबासाहेब झाले सा-या जनांचे...!!
---मिनाक्षी नागराळे
-
मुर्ख लोकं कधीही गैरसमज पेरून मैत्रीचं नातं
तोडून टाकतात आणि नंतर मनातल्या मनात पश्चात्ताप करत बसतात.
_____मिनाक्षी नागराळे वाशिम-
बुरसटलेल्या विचारांची
जेंव्हा होईल राखरांगोळी
तेंव्हाच होईल क्रांती आणि
विधवांच्याही कुंकू दिसेल भाळी....
----मिनाक्षी पांडुरंग नागराळे-
नऊ रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा
नऊ दिवस अनाथांची सेवा कर
नवनवीन शिकण्याची जिद्द ठेव
आणि यशाची शिखरे पार कर...
--+मिनाक्षी पांडुरंग नागराळे
-
नऊ रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा
नऊ दिवस अनाथांची सेवा कर
नवनवीन शिकण्याची जिद्द ठेव
आणि यशाची शिखरे पार कर...
--+मिनाक्षी पांडुरंग नागराळे
-
तिचा विरह
म्हणजे असंख्य वेदना
तिचं निष्पाप प्रेम म्हणजे
एक मानवी चेतना...!!
--- मिनाक्षी नागराळे वाशिम— % &-
तिच्या कुशीत
जग विसरण्याची ताकद
अन स्वत: हरवून
बसण्याची शक्तीही...
---मिनाक्षी नागराळे वाशिम
— % &-
शब्द माझ्या मनातले
मी काव्यातून मांडते
अन्यायाविरुद्ध आवाज
उठवत लेखणीतून भांडते...!!
--- मिनाक्षी नागराळे वाशिम-
रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत
सदा हरवून जाते माझे मन
फुलासम नाजूक आहे मी
तेवढेच नाजुक माझे मन....!!
---मिनाक्षी नागराळे वाशिम-