आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळच्या सुर्यदर्शनानंतर🌄 थेट रातीचा काळोख जाणवतोय..🌃
काय सांगू तुम्हास!
आमचीपण तेव्हा 'वेळ' होती...
एक ' रम्य सायंकाळ'👫पण होत होती!-
and B.Tech from SGGSIE&T,Nanded.
Poet📝
Speaker🎙
Photographer... read more
खरं प्रेम अजरामर असतं..
आयुष्याच्या भल्या मोठ्या कप्प्यात ते इवल्याश्या बंद तिजोरीत ते सुरक्षित असतं...
नातं तुटलं तरी तिजोरी काढायची हिम्मत होत नाही अन पुढच्या धावपळीच्या जीवनात तिकडं लक्ष पण जात नाही..
खरं प्रेम कुठं मरतं का हो!..-
आयुषयात वाईट वेळेत घाबरायचं नाही..
आणि खंत पण वाटू द्यायचं नाही..
लढायचं परिस्थिशी!
मग जेव्हा चांगली वेळ येईल तेव्हा आनंद वाटला पाहिजे की मी 'त्या'वेळच्या काळोख्यातून इथं आलोय!😊-
माझ्या दोन-तीन डोळ्यातील थेंबानी तूझ्या चेहरी स्मित हास्य उमटतं न..
तर तू फ़क्त डोळे मीट!
क्षणार्धात तू डोळे उघडेपर्यंत तुझ्या समोर अश्रूंचा सागर मी उभारलेला असेल..
शेवटी तुझ्या खुशीसाठी....
प्रेमाचा सागर असेल तो...-
इवल्याश्या या आयुष्यात प्रत्येकाला खूप काही हवं असतं.
पण चांदण्यांनी भरूनसुद्धा प्रत्येकाला आपलं आभाळ रिकामं वाटत असतं..-
स्वप्न पाहण्यासाठी एक रात्र सुद्धा पुष्कळ असते.
स्वप्नपूर्तीसाठी उभं आयुष्यसुद्धा कमी पडतं...
देव देतांना इतकं देतो की कुठं ठेवावं कळत नाही..
अन घेताना इतकं घेतो जगावं की मरावं कळत नाही..-
तू👧 आणि पाऊसाची सर⛈
दोघेपण दिलासा देणारी..
स्वछंदपणे बरसणारी..
कधी अचानक तर कधी सांगून येणारी..
कधी मनाला नाराज तर कधी फुलवणारी..
चातकासारखी मनाला वाट पाहायला लावणारी..
कधिपन आलात तरी मनाला हेलावून वेड करणारी..😢
-
जाता जाता काही देता यावं..
देता देता काही घेता यावं..
चिमणी बनूनी टिपता यावं..
असच जीवन जगता यावं..
#कुठंतरी वाचलेलं-
आयुष्य अगदी आनंदात जगता आलं पाहिजे..
असणाऱ्यां'सोबत' आणि नसणाऱ्यां'शिवाय'..-