धुंदीत पान फुले वेली
शालूत हिरव्या नटलेली वसुंधरा
टप टप थेंबांचा नाच
परळीवर गवताच्या ओघळणारा
नद्या नाले डोंगर झाडी
झुळझुळ वाहते झरे
काटेरी मुकुटावर पर्णांचा साज
झटपट टिपा दृश्य क्यामेऱ्यात सारे
नवलाईची ही नवी फुले
चिंब पावसात होऊन डुले
बघण्या पुन्हा पुन्हा ते दृश्य
मनी सजवु आनंदाचे झुले
~Madhuri P. Warwatkar... ✍️
-
🍀 हे जीवन सुंदर आहे ....
❤Reading lover..
🎵Music lover..
Birth da... read more
धुंदीत पान फुले वेली
शालूत हिरव्या नटलेली वसुंधरा
टप टप थेंबांचा नाच
परळीवर गवताच्या ओघळणारा
नद्या माले डोंगर झाडी
झुळझुळ वाहते झरे
काटेरी मुकुटावर पर्णांचा साज
छेडित सुसाट धावते वारे
पार करून क्षितिज
स्पर्श करण्या आकाश सखोल
चौकट चित्रफितीची आसुसलेली
साठवुन ठेवण्या दृश्य ते अनमोल
~Madhuri P. Warwatkar... ✍️
-
मारण्याआधी वडाला फेरे
बिचाऱ्या नवऱ्यालाही विचारा...
चालेल का हीच पत्नी सात जन्मी
बांधू का वडाला मी दोरा...
~Madhuri P. Warwatkar... ✍️
-
मैत्रीचे नाते असावे असे
नितळ प्रतिमा दाखविणारे आरसे
भावना जिथे होतात व्यक्तं
मन तिथे होतो रिक्त
स्वार्थाला जिथे जागा नसतं
गंध आपुलकीचा असतो दरवळत फक्त
सर्वच नात्यात थोडी मैत्री असावी समाविष्ट
शुद्ध देसी घी चा स्वाद जसा मस्त-
एक मन उडतं आकाशी
मोरपंख ते घेऊन उराशी
चमचमत्या चांदण्यातून विहारत
बिलगण्या सप्तरंगी स्वप्नांशी
दुसरं मन योग्य अयोग्य तोलतो
संस्कार विवेकांची सांगतो महती
द्ंद हे मनाचे मनाशी
द्विधा ही मनाची अविरत चालती-
निसर्ग दाता निसर्ग त्राता
निसर्ग जीव कि प्राण
अस्थित्व तुझे देणं त्याची
निसर्ग सौंदर्याची खाण
पर्यावरण दिनी घेवू प्रण
निसर्ग ते प्रत्येकाने जपू
सावलीच्या त्या विसाव्याला
नका निर्दयीपणे कापू
उगविण्याचे दायित्व त्याचेच
फक्त राख त्याची निगा
एवढे केले तरी आहे पुरे
हो मानवा तू आता जागा
~Madhuri P. Warwatkar... ✍️
-
🌹प्रभात पुष्प🌹
उषःकाल जाहले
नभी नारायण प्रगटले
ऊन हळदीचे फासुणी
रूप अवनीचे शृंगारले-
स्वप्नांचा ग हा झुला
किती मोहक तो भासे
भुरळ घाली मनाला
मन भुलवी कसे
भासे वारा तो सुखविणारा
पण समाधान नसे
पुन्हा पुन्हा चा तो ध्यास
मनाचा स्थिरावू कसे
चंचल त्या मनाला
वाटे सारेच हवेहवेसे
कसे सांगू त्याला मृगजळाचे
गुंतविणारे हे सारे फासे-
रंग उन्हाळ्याचे गडद
ओकत्या उन्हाच्या झळा...
ढगाळ वातावरणाने गिळला
ऐन मे चा रंग भेदक पिवळा...
उन्हाळ्यात पावसाळा
पावसाळ्यात उन्हाळा...
निसर्गाने बदलली चाल
अन् झाला घोळ सगळा...
माणसेही झाली फितूर
नाही उरला मणी जिव्हाळा...
चेहऱ्यावर ओढले मुखवटे
आत्मसन्मानाचा पिचकुन गळा...-
जाऊ कुठे सख्या दुविधा रे मनात
स्वप्न रंगवित तुझ्या सवे आली रे वनात
कशी येऊ वनातून त्यापल्याड घर तुझे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे...
दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
कशी करू पार लाटा हा चंद्रही जातो दूर
कशी सावरू एकटी मनाचे हे ओझे
जिवलगा राहील रे दूर घर माझे...
आले वादळ बेभाण अन् मी झाले सैरावैरा
दमलेल्या त्या मनाला जिथे भेटला निवारा
त्यात गुंतलेले कसे सोडून मन माझे
जिवलगा राहिले रे दूर घर माझे...-