स्वतःच स्वतःला दिलेल्या वचनांशी एकनिष्ठ रहावं मग भलेही हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींची इच्छा पूर्ती होवो न होवो, मनाला इतरत्र भटकू न द्यावं.... ..... आशा....
प्रत्येकाच्या आयुष्यात काही गुढ रहस्य अशी असतात की, ती कधी व्यक्त ही करता येत नाही आणि त्यापासून मनाला होणारा त्रास ही कमी करता येत नाही... एक मात्र होते की, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याबरोबर कोणी असो वा नसो पण ही गुढ रहस्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याबरोबर असतात... .... आशा....
मनाला त्रास देणाऱ्या गोष्टीत आता अडकायचे नाही कोणी काही बोलले तरी आता जास्त मनावर जास्त घ्यायचेच नाही आपल्याला जे जे आवडते ते ते सर्व काही करायचे, लोक काय म्हणतील याचा विचारच करायचा नाही जीवन आपल्या पद्धतीने जगायचे, यामध्ये कोणी काही ढवळाढवळ केली तर अजिबात खपवून घ्यायचे नाही..... ..... आशा... Madhu kadam
जो काही तुम्ही निर्णय घेतला आहे त्यावर अगदी ठाम राहा.. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही decision एकदम perfect कधीच नसतो तो decision घेताना मनाची अगदी तारेवरची कसरत होत असते... काही वेळा अशा decision मुळे खूप काही गमवावे लागते... पण कधकधी अशा decision मुळे आपले नाही पण आपल्या लोकांचे नक्कीच चांगले होते... .... आशा...
आपले वय म्हणजे आपल्याला आलेला तेवढ्या वर्षाचा अनुभव... अनुभव हा चांगल्या गोष्टींचा नाही तर आपल्या हातून झालेल्या चुकीच्या गोष्टींचा... पुढील आयुष्य जगताना आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट याची महत्वपूर्ण समज ...... .... आशा...
एखाद्या व्यक्तीबाबत नुसते वरवरचे attraction काही कामाचे नसते.... खरे तर जोपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर रहात नाही तोपर्यंत तो माणूस कसा आहे हे तुम्हाला कधीही समजणारच नाही... .... आशा...Madhu kadam