सगळे गेले सोडून,मी एकटाच आता.
बदलले सगळे मार्ग चुकल्या साऱ्या वाटा.
नियतीनं मांडला सारीपाट,आयुष्याचा खेळ झाला.
फासे असे पडले की,त्याचा माझ्याच गळी फास पडला....-
शांत निद्रिस्त झालो,
कर्म या जगीचे पूर्ण झाले.
संपलेल्या नात्यांना गेल्यावर भान आले,
छान रंगीत आयुष्याला माझ्या,
बेरंग करण्यात सुख ज्यांना मिळाले.
आता गेल्यावर सुद्धा उधळतायेत रंग या बेरंग शरीरावर
सांगा त्यांना हे असुरी दुःख कसले झाले.
ज्या समयी द्यायचा आधार नेमका,
त्याक्षणी घरचे खांब माझ्या उखडून गेले.
अन् विझलेल्या या विस्तवाला
खांदयावर घेऊन एकत्र चालले....-
रस्ते के पत्थरों ने दिया सहारा बिना कुछ कहे।
अपनों ने तो सिर्फ उठाया जनाजा बहोत कुछ कहे।
कौन अपना, कौन पराया रास्ते और मंजिलों ने बता दिया।
मिला जब एक मुद्दत के बाद कुछ अपनों से तो दिल ने कहा ,
तुमने किन गैरों से मिला दिया।।-
किती हे प्रश्न,किती उत्तरे ही मनी,
एक किनारा जुना,एक होडी नवी,
एक चंचल,अस्थिर,अनंत सखा,
एक स्थिर,शांत,एकध्यासी सखी.....-
सवय तुझी बघ किती ही लाघवी,
दारीचे ब्रम्हकमळ देखील तू गेल्यावर फुललेच नाही...
पडतो सडा रोज अबोलीच्या फुलांचा पण ,
झाडाशिवाय त्यांना कोणी माळलेच नाही....-
दिवसा ती त्याच्या शोधात सगळीकडे हिंडते,
रात्र होताच ती त्याचा बाहुत पहुडते...-
डोळ्यांवर स्वप्नांचा किती हा पसारा,
आसवांना पापण्यांचा किनारा.
आठवणींचा डोह भरतो तेव्हा,
ओठांवर दवाचा फुलतो पिसारा......-
उसने अपने नैनों के तरकश से कुछ तीर एैसे चलाए की,
हमने घायल होना ही मुनासिब समझा।-
सांग सख्या रे का पडतो पाऊस.....
अश्रू बनून का रडतो पाऊस.
संपतात जिथे शब्द ओठीचे,
तेव्हाच नेमकं का कळतो पाऊस.
नुसत्याच भरभर पडता धारा.
संगे आठवणींच्या सोसाट्याचा वारा.
विजेसारखी तिची प्रतिमा दिसते तेव्हा,
पाण्यातही का जाळतो पाऊस.
सांग सख्या रे का पडतो पाऊस.....
चिंब चिंब भिजतो जेव्हा,सर्व शाई वाहून जाते.
हृदयाच्या पानावर मात्र,सर्व काही तसेच राहते,
जेवढं जास्त भिजतो मी,
तेवढं जास्त ते उत्कट होते.
माझी ही घालमेल बघून,
तेव्हाच नेमकं काय हसतो पाऊस.
सांग सख्या रे का पडतो पाऊस.....
-
गेलेल्या गोष्टींचा उसासा कशाला,
डोळ्यांवर आठवणींचा पहारा कशाला,
ठरलंय कैद करून मारायचं,तर
त्याला मिठ्ठी म्हणायचा हट्ट कशाला...-