पायाच्या बोटात जोडव्या घालून घेत होती,
तेव्हाच मला झोप येत होती.
त्या क्षणी एक भुतकाळ आठवलं,
दिवाळीसाठी आईकडे गेलेले खूप दिवसांनी घरी गेलेली
म्हणून सगळे खूप लाड करत होते,
दिवाळीच्या एक दिवस आधी मी रात्री
उशिरापर्यंत आई सोबत बोलत होते,बोलून मी झोपी गेली.
रात्री उशिरा झोपल्याने सकाळी उशिरा जाग आली,
अंथरूणातच डोळ्यांची उघडझाप चालू असताना
पाय थोडे जड वाटु लागले,
अरे बापरे पायाला काय झालं हे विचार येताच उठून बसली
बघते तर पायांच्या चार बोटं गच्च जोडव्या,
म्हासोळ्या आणि पैंजण.
सगळं बघून काय बोलावं कळेना,
मी लग्नानंतर घरी आलेला आईचा आनंद
गगनात मावेनासा झाला होता,
तिला हे सगळे दागदागिन्यांचा हौस टिपण्यासारखा होता.
एकीकडे खूप खूप आनंद झाला,
एकीकडे दुःख की मी ह्या सगळ्या गोष्टीपासून किती लांब आहे.
हा सगळा प्रसंग डोळ्यांसमोरून गेलाअन् त्यासोबत झोपही गेली.
पण त्या दिवशीच्या भावना मात्र परत आहे तसं मनाला स्पर्श केल्या.
-