बदल महत्वाचा असतो
तूच सांगितलं होतं
तुझ्यात हळूहळू होत होता
तुच दाखवलं होतं...
स्वतःचीच लाज वाटते
मागे वळून पाहील्यावर
कसलं आलंय महत्व
काळजाला आग लागल्यावर...
-
एक विद्रोही बंडखोर,
समाजसेवा, कवी,विद्रोही जलसा,वाचक,लेखक,
✒️... read more
तू भुतकाळावर प्रकाश टाकावा
आणि माझ्या पात्रावर धुळ दिसावी
येवढा दोष कायमच करत राहा
तुझं प्रकाशित म्हणं म्हत्वाचं आहे...-
विस्कटल्या गेल्या पाकळ्या गुलाबांच्या
सुंदरता घातक ठरली नजरेत आतंकवादाच्या..-
फार वेळ लावलास शब्दांवर
नजर फिरवायला
नव्याने टिपलेल्या भावनांची
पाहणी करायला..-
तुझ्या अंतर मनाची ओळख झाली प्रिये म्हणून तर
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर माझा भरोसा राहीला नाही...-
तु सिमा आखली नव्हती
म्हणून तर हिंमत आली
मिठीत घेऊन देहाला मग
श्वासांची आपली भेट झाली..-
ओठांचा स्पर्श प्रकाशित
आपल्या कधी होणार नाही,
घडलेल्या रंगीन रातीचा
उल्लेख कवितेत होणार नाही...-
मी तो पर्यंत जळत राहीन प्रिये
जो पर्यंत तुझ्या वाट्याला उजेड येत नाही..-
आयुष्याला उत्तर देण्याची
हिंम्मत तरी मी कसा करु
कोणाच्या तरी नावावर
आयुष्य उधळताना
कसलाच विचार केला नाही
हरणं,उध्वस्त होणं, जख्मांचा
शिकार होणं, याची तक्रार
कोणाकडेच करता येत नाही
कारण विश्वासाने उत्तर जाळून टाकलंय
कोणतं आणि कसलं उत्तर देऊ आयुष्याला..-
शब्दांची रांगोळी विस्कटून
टाकू शकतेस प्रिये
शब्दांच्या कणाकणात
माझं मन असलं तरी
माझे शब्द तुझ्या साऱ्या
अधिकराचे गुलाम आहेत
म्हणूनच रांगोळी तुडवली
तरी तो हक्क असेल तुझा
न्याय मिळेल सजावट
केलेल्या शब्दांना ही
आस लागत नाही
कारण मी सारं सोडून दिलंय
तू घेशील त्या निर्णयावर...-