काल स्वप्नात माझ्या,
गेली मी अनोळखी गावा...
जिथे होता फक्त अन फक्त
प्रेमाचाच ओलावा....
फुलांचा सुगंध तिथे
मातीचा दरवळही
होता रंगीबेरंगी फुलपाखरांचा थवा
अन फुलांचा ताटवा....
संथ वाहणार पाणी होत
खोल खोल समुद्रही
लाटांचा निखळ खळखळाट होता
अन शांत गंभीर किनाराही...
रानावनात फिरली
फुलपाखरांसवे खेळली
मनसोक्त बागडली,
माझ्यातली मीच मला पुन्हा नव्याने गवसली,
कारण गेली होती मी अनोळखी गावा
काल स्वप्नांत माझ्या.....!-
तिचा निरागसपणा इथे पसंद नाही,
इकडची दुनियादारी तिला जमत नाही...
.
.
.
हे शहर अजूनही अनोळखीच वाटतंय...!-
ती येईल धावत तुझ्यापाशी, तुझ्या लाटांसोबत खेळायला, मनातील सार काही सांगायला, तुझ्या मऊशार रेतीवर तिच्या स्वप्नातला बंगला सजवायला....अन तो क्षण येइलच
.
.
.
जेव्हा सूर्यास्ताची वेळ होईल,
ती घुटमळेल दोन क्षण,
पण तिला जावंच लागेल, कारण तिच्यासाठी प्रेमापेक्षा कर्तव्य महत्वाचं असेल...
निघून जाईल ती काळजावर दगड ठेवून,
पण तू निराश नको होऊ
, ती तुझ्याकडे नक्की परत येईल तुझ्या ओढीने या किनाऱ्यापाशीच कारण "तू तिच्या मनाचा कोपरा आहेस"-
विसर्जनाच्या नावाखाली काही लोकांनी,
बाप्पाची केलेली विटंबना पहिली की....
.
.
.
मला नास्तिक लोकांचा हेवा वाटतो...!-
मी: गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या...
बाप्पा: कशाला...? सांग ना मला तूच एक तरी अस कारण की मी का येऊ
इथली कर्कश कानठळ्या बसतील
अशी अश्लील गाणी ऐकायला,
की जेथे मला तुम्ही इतक्या प्रेमाने बसवलं
माझी प्रतिष्ठापणा केली,
काहींकडून गोडीने,
तर काहींना दमदाटी करून वर्गणी गोळा केली,
तर त्याच वर्गणीची
माझ्या समोर बसून दारू पित,
पत्ते खेळत रात्र जागवली.... का तर म्हणे हे माझी
म्हणजेच मंडळाची रक्षा करणार...अगोदर स्वतः नीट उभं रहायला शिका...
"अन काय ग ,
अशी कशी तुम्हा आता मुलांची भक्ती"
मला पाया पडायला येत होता की'
फोटोशूट करायला..
तुमच्या मोबाईल मधून
तुम्हाला माझ्याकडे बघायला वेळ होता का...?
"मला डोळ्यांत साठवण्यापेक्षा
तुमचा सगळ्यात जास्त कल
मला मोबाइल मध्ये कैद करून
social site वर पोस्ट करण्यात
नि किती like,भेटले यावर होता....
तुम्हाला माझ्यापेक्षा मोबाईल प्रिय असेल,
तर आपण पण करू whatsup वर ग्रुप create
मी का माझ्या आईबाबांना सोडून येऊ
तिथूनच बोलू की आपण मनसोक्त...
तुम्हाला पण त्रास नको नि मलाही...-
विसर्जनाच्या नावाखाली
काही लोकांनी,
बाप्पाची चालवलेली विटंबना पाहून
मला नास्तिक लोकांचा हेवा वाटतो...-
विघ्नसंतुष्टी माणूस नावाच्या प्राण्याने
गाभारा भरला,
मला हे दे तर मी तुला ते देईन, असा
प्रार्थनारुपी अपेक्षांचा पाऊस ही पडला,
पण या दहा दिवसाच्या दिखाव्याने बाप्पा माझा कंटाळला-
घराच्या चौकटीतुन ती सहज बाहेर पडेलही,
प्रश्न आहे तो मनाच्या उंबरठ्याचा,
तो ओलांडने तिला सहजासहजी शक्य नाही!!!-
त्याच्या नुसत्या विचाराने मन चिंब होत,
दिवसा-ढवळ्या वेडं मन आता त्याचंच स्वप्न पाहत...-
असावं कुणीतरी जीवनात साथ देणार
हातात हात घेऊन शब्दांशिवाय बोलणार!!!
असावं कुणीतरी हक्कानं रागावणार
कितीही चुकले मी तरी मला कधीच सोडून न जाणारं!!!
असावं कोणीतरी मला आपलं म्हणणार
नजरेतले भाव जाणून मनातल ओळखणार!!!
असावं कुणीतरी वास्तवाचं भान देणार
तर कधी कल्पनेच्या विश्वातही माझ्यासवे रमणार!!!
असावं कुणीतरी एकांतात रेंगळणार
माझ्यासोबत नसूनही माझ्यासोबत असणार!!!
-