आज मैत्रिणीचा फोन आला आणि समजलं ताठे सर गेलेत. सर नेहमी म्हणायचे , आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून हसत रहावे आणि वर्तमानात जगावे. पण आज भूतकाळ आठवला. वैदिक गणिताची सरांनी करून दिलेली ओळख, कसं का होईना पण पाठांतर करून घेतलेले संस्कृत मधील श्र्लोक,Time machine वर झालेली गमतीदार चर्चा आणि बरंच काही. असं म्हणतात एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्ज्वलित करू शकतो आणि ताठे सरांना भेटल्यावर या गोष्टीची प्रचिती आली. सर जरी तुम्ही आमच्या सोबत नसाल तरी तुमची शिकवण नेहमीच आमच्या सोबत असेल.
भावपूर्ण श्रद्धांजली सर! 🙏
-