संकटांचा घोळका
आयुष्यात संकट घोळक्या घोळक्याने येत असतात,
मग एका एका संकटावर मात करत करत,
एक वेळ अशी येते की सगळं काही सुरळीत चालू होतं,
आणि सगळं काही सुरळीत चालू आहे हे लक्षात आलं,
की दुसरा संकटांचा घोळका समोर रांगेत उभा असतो.
मग काय.....
मला कसं भुलवलं? म्हणून संकट गालातल्या गालात हसत असतात.....
आणि त्यांना कसं हाताळायचं हे माहीत आहे म्हणून मीही स्मितहास्य करतो.....-
Dream to become writer
Love to read and write
Connect me on Insta ... read more
हिवाळ्याच्या सुरुवतीलाच कोरडी झालेली विहीर....
हिवाळा सरून जाता जाता,
तिचं पाणीही सरून गेलं.
न सांगताच मन मग माझ,
दहा वर्ष मागे गेलं.
हिवाळ्याच तर सोडूनच द्या,
उन्हाळ्यात सुद्धा तिला पाणी असायचं.
तिचं पाणी पिण्यासाठी,
सार गाव रांगेत असायचं.
काय झालं कसं झालं काहिच कुणाला कळलं नाही,
गावाला कधी नजर लागली तेही कुणाला कळलं नाही.
गावाबाहेरच्या डोंगरावर वृक्षतोड सुरू झाली,
पावसाची हजेरीही मग हळु हळु कमी झाली.
असच एक पर्व सरून गेलं,
निसर्ग चक्र अगदी झपाट्याने बदलून गेलं.
हिवाळा सरून जाता जाता,
तिचं पाणीही सरून गेलं.
न सांगताच मन मग माझ,
दहा वर्ष मागे गेलं.-
भूतकाळातील सैर....
सहजच कधीतरी,
मध्यरात्री उलटून गेल्यावर.
माझं आणि झोपेच,
कडाक्याचं भांडण व्हावं.
विचार शून्य मन माझं,
अगदी घोड्यावरती स्वार व्हावं.
कल्पनाविश्वात विहार करत करत,
त्यानं भूतकाळात जाऊन थांबावं.
भूतकाळातल्या काही क्षणांना,
त्यानं पुन्हा पुन्हा जगून पहावं.-
आयुष्यात कुणी कितीही मोठं झालं, कितीही यश, संपत्ती संपादन केली, तरीही आयुष्याच्या एका वळणावर नात्यांचा आधार लागतोच.
-
काय होता तो एसटीचा प्रवास
संत्रा गोळी खात खात,
झाडे मागे पळताना चा भास.
तालुक्याला प्रवास करताना
एसटीच ते जागोजागी थांबन,
एसटी थांबली की लगेच,
घरच्यांकडे काही ना काही मागणं.-
निसर्गानं कोकणाला भरभरून दिलं
आता कुणीतरी आ वासून उभा आहे हिरावून घेण्यासाठी.
शेकडो आंब्या काजूच्या बागा तोडू पाहात आहे.
शेकडो वर्ष जुनी कातळशिल्प नामशेष करू पाहात आहे.
कोकणातील जैवविविधतेला गालबोट लावू पाहात आहे.
कोकण जगणाऱ्या आणि जपणाऱ्या माणसांच्या स्वप्नांवर विरजण घालू पाहात आहे.-
ही रम्य संध्याकाळ,
न चुकता येते.
सोबत आठवणींना घेते.
अलगदच हात धरून.
स्वप्नांच्या गावी नेते.-
गावाकडचं घर पडलं,
तेवढी माती काढण्यासाठी येरे....
दारासमोरचा पिंपळ पडला,
पुन्हा एक पिंपळ लावण्यासाठी येरे....
ओळखीची बरीच माणसे काळ झाली,
जी उरलीत त्यांना एकदा भेटण्यासाठी तरी येरे....-
हे पाहिजेत, ते पाहिजेत करता करता,
माझ्याजवळ जे होतं ते पाहायचं राहून गेलं....
माझ्याजवळही होती थोडी आपली माणसं,
त्यांच्यासोबत अजून थोडं बोलायचं राहून गेलं....-
पारावर बसून चर्चा करणारी पिढी संपणार बहुतेक
संध्याकाळी पारावर आता गर्दी दिसत नाही.
पारावर बसून पीक पाण्याबद्दल, गावातील सुखदुःखाबद्दल चर्चा सुद्धा होत नाही.
पार सुद्धा आता अगदी भेगाळला आहे.....
पारावर बसून चर्चा करणारी पिढी संपणार बहुतेक...-