Gopal Gote   (Gopal Gote)
728 Followers · 382 Following

read more
Joined 4 September 2021


read more
Joined 4 September 2021
16 APR AT 1:27

अपवादात्मक दुःख.....

सगळीच दुःख जगासमोर व्यक्त झाल्याने कमी होत नाहीत.
प्रत्येकाचं अपवादात्मक, आपलं म्हणावं अस एक दुःख असतंच,
ते दुःख जगाला कळता कामा नये.
जोपर्यंत ते आपल्या पर्यंत मर्यादीत आहे, तोपर्यंत ठीक.
पण एकदा का ते जगाला कळलं,
की त्याचा गुणाकार सुरू होतो, एवढं मात्र नक्की.
ज्या दिवशी ते "अपवादात्मक दुःख" ओळखता आलं,
त्या दिवसापासून जीवन थोड सुकर होऊन जात.

-


7 APR AT 1:44

निसर्गाशी संवाद साधताना,
जेव्हा शब्दही संपत जातात,
तेव्हा भावना बोलू पाहतात.
अपूर्ण राहिलेला संवाद,
त्याही पूर्ण करू पाहतात.

-


30 MAR AT 23:01


आजकाल एकांतातही मी माझ्या मनाला,
एकटं कधीच सोडत नाही.
आणि सोडलंच त्याला कधी एकटं तर ते,
जुन्या आठवणींचा गाठोड सोडल्याशिवाय राहत नाही.

-


30 JAN AT 21:56

एकदा तरी त्या वाऱ्यासारखं होता आलं पाहिजे.

वाऱ्याच्या मागावर जात आलं पाहिजे,
जमिनीपासून थोड वर आणि ढगांच्या थोडं खाली उडता आलं पाहिजे.
एकदा तरी त्या वाऱ्यासारख होता आल पाहिजे.
उंचच उंच उडून सुद्धा जमिनीवर येता आल पाहिजे,
एकदा तरी त्या वाऱ्यासारखं होता आलं पाहिजे.

-


17 JAN AT 22:26

तुम्ही यश संपादन केलं का?, तुम्ही सुखी आहात का?, तुमच्याकडे भरपूर धन आहे का? या प्रश्नांची उत्तरे तुम्ही यश, सुख, इत्यादी गोष्टींच्या व्याख्या काय करता यावर अवलंबून आहे....

-


27 DEC 2023 AT 19:18

वेळ...
वेळ कशी निघून जाते कळतही नाही.
वर्षां मागून वर्ष संपतात.
माझं पुढे काय, माझं पुढे काय, असं करता करता.
आपल्या माणसांचा हात सुटत चालल्याची जाणीव,
होत नसावी कदाचित.
आणि जेव्हा ही जाणीव होते,
तेव्हा आपल्यांचा हात कधीच सुटलेला असतो.
कदाचित भावनाही बोथट होऊ लागतात,
आपल्यांना सोडून एक क्षणही न राहणारा,
वर्ष वर्ष सुद्धा आठवण काढत नाही.

-


21 NOV 2023 AT 19:40


अपूर्ण विचार..

त्याच तलावाच्या काठावर, तशीच एक रात्र होईल.
पुन्हा एकदा त्याच ठिकाणी, तोच विचार स्वार होईल.
आता मात्र पहिल्यासारखा, विचारापासून पळू नकोस.
पूर्ण केल्याशिवाय त्या विचाराला, माघारी काही फिरू नकोस.

-


16 NOV 2023 AT 20:25

गाव गाव करता करता
कधी शहर जवळच वाटून गेलं कळलं सुद्धा नाही

-


9 NOV 2023 AT 0:56

कोण काय म्हणेल ह्या विचारापुढे स्वतःच मन काय म्हणेल हा विचार बहुतांश वेळा हरतो.

-


8 NOV 2023 AT 21:35

गावची आठवण

कितीही सुखसुविधा असू द्या,
कितीही चैनीच्या वस्तू असू द्या.
नवीन शहरातील नवीन दहा दिवस संपले,
की शेवटी अकराव्या दिवसात "गावची आठवण" येतेच.

-


Fetching Gopal Gote Quotes