......
-
अवघड शब्दांचा खेळ, मला कधी... read more
आजूबाजूला हिरवीगार, लुसलुशीत झाडं आहेत,
पण हे दोघं मात्र या नीरस,
पानगळ झालेल्या झाडावर विसावलेत.
कधीतरी काहीतरी असेल का या झाडासोबत त्यांचं?
असेलच बहुतेक,
पण जे काही आहे ते त्या दोघांना आणि त्या झाडालाच माहिती.
————————————
रस्त्याच्या कडेला हिरव्यागार झाडांच्या मधोमध हे झाड आणि त्यावर बसलेले ते दोन पक्षी दिसले. आणि विचार आला की कधी कधी अनेक पर्याय समोर असतानाही आपण एखादा पर्याय का निवडतो ते फक्त आपल्यालाच माहिती असतं.
————————————-
"तो कवडसा..."
सकाळी सकाळी एक कवडसा,
पत्र्याच्या छपराच्या फटीतून हळूच आत यायचा,
एकदा आत आला की मग,
साऱ्या घरभर तो फिरायचा.
कधी चुलीवरच्या वाफेत मिसळायचा,
तर कधी भिंतीवर तो खेळायचा.
कधी जुन्या कपाटात डोकावायचा,
तर कधी जात्यावर तो रेंगायचा.
तेव्हा घर साधं होतं,
फक्त पत्रं, भिंती, आणि आपुलकी.
तस छत गळायचं म्हणा कधी कधी,
पण घरात म्हणाल तर मोकळा श्वास होता.
आता घर पक्कं झालंय बर का,
सिमेंटचं, हवाबंद खिडक्या आणि दरवाज्यांचं.
आता खिडक्या आणि दरवाजा उघडला तरी,
तो कवडसा आत यायचं धाडस करत नाही.
त्याला ना येण्यासाठी फटी उरल्या,
ना आपण तितके मोकळे राहिलो.
तो उभा असतो बाहेर… आणि आपण?
आपण मात्र कदाचित त्याच्याकडे बघणं विसरलो...
-
काळी रेषा…..
ही काळी रेषा वर आकाशात नाही,
तर आपल्या भविष्यांत कोरली जाते आहे.
या अशा कारखान्याच्या चिमणीतून उसळणारा हा गडद धूर म्हणजे,
निसर्गाच्या गळ्यात घट्ट आवळलेला फास आहे.
प्रत्येक श्वासात मिसळणारी ही काळी करपट केवळ हवा नाही,
तर विष आहे विष जे हळूहळू आपल्या रक्तात,
आपल्या पिकांत, आणि आपल्या पाण्यात मिसळते आहे.
आपण प्रगतीच्या नावाखाली हा धूर देऊन काय मिळवतो आहे?
थोडे नफ्याचे आकडे…
पण बदल्यात ढासळणारे आरोग्य,
वांझ झालेली माती,
आणि श्वास घेण्यास तडफडणारी पुढची पिढी,
हे सर्व आज आपल्याला मिळत आहे.
हे फक्त प्रदूषण नाही तर,
हे मानवाच्या स्वार्थाचा,
आणि निसर्गाशी केलेल्या विश्वासघाताचा,
उघड जिवंत पुरावा आहे.-
शहराच्या कडेला असलेल्या खिडकीतून,
अंधारात बुडालेला गाव बघितला का कधी?
.................................................................
कधीकधी अंधारही प्रकाशापेक्षा जास्त सुंदर वाटतो,
कारण तो मनाला जुन्या आठवणींच्या उजेडात घेऊन जातो.-
जगण्याचं सौंदर्य…..
हा अर्धा वाळलेला आणि अर्धा जिवंत वृक्ष,
येणाऱ्या जाणाऱ्याला जणू सांगू पाहत आहे. की
"जगण्याचं सौंदर्य फक्त संपूर्णतेत नसतं, तर ते
अपूर्णतेत पण असतं.."
.............................................................
आणि हेच खरं आयुष्य आहे,
कधीतरी आपल्या मनात काही तरी हरवतं, ढासळतं,
पण त्याच वेळी दुसऱ्या टोकाला काही तरी नव्यानं उगम पावंतं.
वाळलेलं जपून ठेवायचं आठवणीत,
आणि जे नव्यानं उगम पावत,
त्याला धरून पुढची वाट चालायची बस.-
काळ विसरतो,
माणसं हरवतात,
पण श्रद्धा,
श्रद्धा अजूनही अशा मंदिरांमधून बोलते.
...........(पूर्ण कॅप्शन मध्ये वाचा)
-